सध्या त्यांनी 180 रक्तदाते जमवले आहेत. नियमित रक्तदान करून या रुग्णांची रक्ताची गरज हा ग्रुप भागवतो. एका रुग्णासाठी 6 ते 7 जणांची टीम तयार करण्यात आली आहे. रक्तगट आणि रुग्णांची संख्या या नुसार ही टीम तयार करण्यात आली. रक्तदानासाठी हा ग्रुप वेळोवेळी जनजागृती कार्यक्रम घेतो, लग्न समारंभात बॅनर लावले जातात, शाळा-कॉलेजात शिबिरं घेतली जातात. गरजेनुसार सोशल मीडियात ही हा ग्रुप रक्तदान, थॅलेसेमिया या विषयावर जनजागृती करतो आहे. विवाहपूर्व चाचणी अतिशय आवश्यक असल्यानं विवाहोत्सुक मंडळींना ते तपासण्या करायला लावतात. जेणेकरून हा आजार पुढच्या पिढीत पसरू नये. त्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या रविवारी कॅम्प घेतला जातो. यासाठी शिक्षक मंडळी, जुना जालन्यातील स्वयंभू ग्रुप, प्रतिष्ठा ग्रुप, प्रदीप मोहरील, आनंद मुळे, संतोष रेगुडे, भूषण बेहेरे, प्रारब्ध दाभाडकर, अमोल गोरे, सुमेर ठाकूर आणि मित्रमंडळ मोलाचा वाटा उचलत आहे.
परभणीतील ‘थॅलेसेमिया सपोर्ट ग्रुप’ची या कामात त्यांना खूप मदत होते. त्यांचे टेक्निशियन सॅम्पल घेतात आणि रिपोर्ट देतात. या तपासणीमधून थॅलेसेमियाग्रस्त रुग्ण सापडला तर त्याला रक्त पुरवण्यासाठी नवे रक्तदाते शोधण्याचं आव्हान हा ग्रुप लीलया पार पाडतो. सर्वसामान्य रक्तदाता दर 3 महिन्यांनी रक्तदान करू शकतो. 18 ते 60 वर्ष वयोगटातील प्रत्येक निरोगी स्त्री, पुरुष रक्त देऊ शकतो. स्वतः मिलिंद लांबे यांनी आता पर्यंत 64 वेळा रक्तदान केलं आहे. तर असं नियमितपणे रक्तदान करणारे या ग्रुपमध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत. सध्या जालना आणि औरंगाबादमध्ये हा ग्रुप काम करतो. जालन्यात 180 तर औरंगाबादेत 156 दात्यांचा ग्रुप तयार झाला आहे. नोव्हेंबर 2016 मध्ये सुरु झालेली ही चळवळ रक्ताच्या नात्यापलीकडे बघणारी आहे.
मिलिंद लांबे यांचा संपर्क क्र. - 9423460876
- अनंत साळी.
No comments:
Post a Comment