Tuesday 4 February 2020

पद्मश्री पुरस्कार विजेत्यांच्या कर्तृत्त्वाला उजाळा...

अहमदनगर जिल्ह्यातल्या बीजमाता राहीबाई पोपेरे आणि पोपटराव पवार. दोघांनाही यंदाचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. त्या निमित्ताने त्यांच्या कार्यकर्तुत्वाला दिलेला उजाळा.
अकोले तालुक्यातील पश्चिम भागातल्या आदिवासी पट्ट्यातलं कोंभाळणे. तिथल्या राहीबाई सोमा पोपेरे. महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसूबाईचं शिखर, हरिचंद्रगड, कोकणकडा, साम्रदची सानंद, अशी उंचचउंच कातळ शिखरं याच भागातील.
राहीबाईंच्या वडिलांकडची परिस्थिती गरिबीची असल्याने शाळा शिकता आली नाही. वयाच्या बाराव्या वर्षी लग्न. आदिवासी भागात देशी बियाणाचा वापर करुनच पिके घेतली जातात. त्यामुळे या भागातील बहूतांश कुटूंबे देशी वाणाचे संवर्धन करतात. राहीबाईंचं कुटूंबही तीन- चार पिढ्यापासुन देशी बियाणांचे संवर्धन करणारं. 2014 साली आदिवासी भागात महिलांसाठी काम करणाऱया बायफ या संस्थेच्या संपर्कात त्या आला. संस्थेचा महाराष्ट्र जनूककोश प्रकल्प या भागात सुरू झाला होता. संस्थेचे नाशिक विभागाचे समन्वयक जितीन साठे एकदा राहीबाईंच्या घरी गेले. तब्बल 54 पिकांचे 116 वाण आणि त्यात वाल आणि पावट्याच्या 20 वाणाचं संवर्धन त्या करत असल्याचं समजलं. 2016 मध्ये बायफच्या पुढाकारातून संस्थेचे अध्यक्ष गिरीष सोहनी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी बियाणे बॅक सुरू केली. त्यांना ‘मदर ऑफ सीड’, बीजमाता अशी ओळख मिळाली. त्यांच्यामुळे दुर्मिळ देशीवाणांचे जतन होत आहे.
अकोले तालुक्यात महिला बचतगटाच्या माध्यमातून वाणांची विक्री होते. अनेक महिलांसाठी हे रोजगाराचे साधन बनलं आहे. परसबाग संकल्पनेच्या माध्यमातून देशी बियाणं राज्यभर पोहोचत आहे.
याच जिल्ह्यातले पोपटराव पवार. तीस वर्षापुर्वी नगर जिल्ह्यामधील सहा ते सात तालुके दुष्काळी. हिवरेबाजार नावाचे गाव त्यातील एक. दुष्काळाने पिचलेल्या आणि त्यामुळेरोजगाराच्या शोधात गाव सोडण्याशिवाय पर्याय नव्हता. पण शहरात उच्च शिक्षण घेतलेले पोपटराव मात्र परतले.
नोकरीच्या शोधात असतानाच त्यांना गावांतील स्थिती मात्र स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे
त्यांनी नोकरी न करता गावी येऊन गावांसाठी काम करण्याचा निर्णय घेतला आणि 1990 मध्ये गावांतील तरुणांना एकत्र केलं वृक्षलागवडीतून इतिहास घडवला.
जलसंधारणाची कामे केली. अल्प पाऊस पडूनही दुष्काळी हिवरेबाजार पाणीदार झाले. गावच्या शाळेतील मुल उपलब्ध झालेल्या पाण्याचा ताळेबंद मांडु लागले. एकेकाळी रोजगारासाठी दुसऱया गावांत जाणारे येथील शेतकरी आता शेकडो लोकांना
आपल्या गावांत रोजगार उपलब्ध करून देत आहेत. कोट्यावधीचं शेती उत्पन्न काढत आहेत. समस्यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा आदर्श घेऊन तीस वर्षापुर्वी गावातील व्यसनमुक्तीचा लढासुरू केला. ही चळवळ यशस्वी झाल्यानंतर त्यांना गावातील लोकांनी सरपंच होण्याचा आग्रह केला. सरपंच झाल्यानंतर त्यांनी पीकपद्धतीतबदल केला. कमी पाण्यावर येणारी पिकांना त्यांनी प्राधान्य दिलं. शेजारील डोंगरावर वृक्षलागवड केली. तसेच जागोजागी पाणलोटाची कामेकेली. त्यातून मोठ्याप्रमाणात पाण्याचा संचय झाला. त्यातून गाव खऱ्या अर्थाने हिरवे झाले. गावाचे उत्पन्न वाढले. तरूणांच्या हाताला
गावातच काम मिळाले. चराईबंदी, कुऱ्हाडबंदी, कुपनलिका बंदी असे विशेष प्रयोगही त्यांनी केले. वीस वर्षापर्वीचगाव हागणदारीमुक्त केलं.गावातील सर्वच घरे महिलांच्या नावावर
आहेत. सर्व निर्णय ग्रामसभेला विचारात घेऊनच होतात. हिवरेबाजारला आतापर्यत दहा लाखापेक्षा अधिक लोकांनी भेटी दिल्यात. येथील कामाचा आदर्श घेऊन
राज्यात आणि देशात अनेक गावे समृद्ध झाली आहेत.
- सूर्यकांत नेटके, नगर
#नवीउमेद #अहमदनगर

No comments:

Post a Comment