नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वरपासून १५ किलोमीटरवर वसलेलं विनायकनगर. गणेशगाव ग्रुप ग्रामपंचायतीतलं गाव. लोकसंख्या ५०० च्या आसपास. इथल्या सर्व विहिरींनी कधीच तळ गाठला आहे. कधीतरी पाण्याचा टँकर आणून विहिरीत ओतला जातो. त्यावर तीन-चार दिवसांचं भागतं. पुन्हा विहीर कोरडी. कपडे धुण्यासाठी महिलांना किमान दीड किलोमीटरवर लांब जावं लागतं. काहींना त्यापेक्षाही दूर.
मात्र इथल्याच शरद महाले यांच्यामुळे २५ ते ३० कुटुंबातल्या महिलांच्या डोक्यावरचा भार तरी हलका झाला आहे. महाले यांची विंधण विहीर. सकाळी आणि संध्याकाळी प्रत्येकी अर्धा तास पाणी. यातून साधारण १०० जणांना ते दररोज दीड ते दोन हजार लिटर पाणी मोफत पुरवत आहेत.
महाले यांची ही विहीर शेतात. गाव आणि शेत यात दीड किलोमीटरचं अंतर. महिलांची पायपीट थांबावी यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून महाले ट्रॅक्टर वापरत आहेत. कसा? गावकरी दररोज त्यांच्या ट्रॅक्टरला आपापल्या नावांच्या रिकाम्या टाक्या बांधतात. महाले ट्रॅक्टर घेऊन शेतात जातात. आपल्या घरासाठी पाणी भरण्यासोबतच ते या टाक्याही भरतात. ट्रॅक्टर गावात आला की महिला आपापली टाकी घेऊन जातात.
शेताच्या आसपास असणारी काही कुटुंबही महाले यांची वाट पाहत असतात. ट्रॅक्टर आला की पाणी भरण्यासाठी एकच धावपळ उडते.
परिसरात ज्या काही निवडक मंडळींकडे पाणी आहे, त्यांच्याकडून ते विकत घ्यावं लागतं. मात्र या हे विनायकनगर, आदिवासीबहुल गाव. इथल्या कुटुंबियांची आर्थिक स्थिती बेताचीच. दुष्काळामुळे बहुतांश पुरूष नाशिक शहर, औद्योगिक वसाहतीत कामाच्या शोधात. काम मिळाले तर दोन पैसे मिळणार, अन्यथा तिथे जाता- येतानाचे भाड्याचेही पैसे वाया जातात. अशा स्थितीत महाले यांची विंधण विहीर ग्रामस्थांना एकमेव आधार आहे.
-प्राची उन्मेष, नाशिक
महाले यांची ही विहीर शेतात. गाव आणि शेत यात दीड किलोमीटरचं अंतर. महिलांची पायपीट थांबावी यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून महाले ट्रॅक्टर वापरत आहेत. कसा? गावकरी दररोज त्यांच्या ट्रॅक्टरला आपापल्या नावांच्या रिकाम्या टाक्या बांधतात. महाले ट्रॅक्टर घेऊन शेतात जातात. आपल्या घरासाठी पाणी भरण्यासोबतच ते या टाक्याही भरतात. ट्रॅक्टर गावात आला की महिला आपापली टाकी घेऊन जातात.
शेताच्या आसपास असणारी काही कुटुंबही महाले यांची वाट पाहत असतात. ट्रॅक्टर आला की पाणी भरण्यासाठी एकच धावपळ उडते.
परिसरात ज्या काही निवडक मंडळींकडे पाणी आहे, त्यांच्याकडून ते विकत घ्यावं लागतं. मात्र या हे विनायकनगर, आदिवासीबहुल गाव. इथल्या कुटुंबियांची आर्थिक स्थिती बेताचीच. दुष्काळामुळे बहुतांश पुरूष नाशिक शहर, औद्योगिक वसाहतीत कामाच्या शोधात. काम मिळाले तर दोन पैसे मिळणार, अन्यथा तिथे जाता- येतानाचे भाड्याचेही पैसे वाया जातात. अशा स्थितीत महाले यांची विंधण विहीर ग्रामस्थांना एकमेव आधार आहे.
-प्राची उन्मेष, नाशिक
No comments:
Post a Comment