शतकांचे शतक अथवा द्विशतक हा शब्द आपण क्रिकेटमध्ये ऐकलेला आणि पाहिलेला आहे. मात्र सोलापुरातील एक अवलियाने चक्क रक्तदानाचं द्विशतक ठोकलं आहे. वयाच्या साडेसतराव्या वर्षांपासून म्हणजे १९७५ सालापासून त्यांनी रक्तदान करण्यास सुरुवात केली होती. आतापर्यंत एकूण दोनशे पाच वेळा त्यांनी रक्तदान केलं आहे.
अशोक नावरे असं त्यांचं नाव. सध्याचं त्यांचं वय साठ आहे. वयाच्या पासष्टाव्या वर्षांपर्यंत रक्तदान करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. ‘ए पॉझिटिव्ह’ हा त्यांचा रक्तगट. रक्तदान करण्याबरोबरच शहर आणि जिल्ह्यामध्ये रक्तदानाविषयी शिबिरेदेखील ते भरवत होते. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना महाराष्ट्र शासनाने ‘शतकवीर दाता’ म्हणून प्रमाणपत्र आणि गौरव पदक देऊन त्यांना सन्मानित केलं आहे.
नावरे सांगतात, “कॉलेजात असताना एकदा रक्तपेढीला भेट दिली होती. तिथं रक्त मिळवण्यासाठी गर्दी जमली होती. अनेक गरजवंत लोक तेव्हा रक्तासाठी रक्तदात्यांच्या पाया पडत होते. हे विदारक चित्र पाहून माझं मन हेलावलं. आणि तेव्हाच आपणही रक्तदान करून एखाद्याचा जीव वाचवू शकतो हा विचार मनात आला आणि त्या दिवसापासून मी रक्तदान करण्यास सुरुवात केली”.
ते पुढं म्हणतात, “दोनशेवेळा रक्तदान करणारा भारतातला मी बहुधा पहिलाच असेन. आतापर्यंत दोनशे पाचवेळा मी रक्तदान केलेले आहे. या कार्यामुळे महाराष्ट्र शासनाने मला शतकवीर म्हणून गौरवलं आहे. रक्तदाना पासून मला मोठे मानसिक समाधान मिळते. रक्तदानाची किंमत पैशात मोजता येत नाही. रक्तदान करण्यात आता माझं कुटुंबही पुढं येत आहे. समाजातही रक्तदान करण्यात मोठी जागरूकता निर्माण होत आहे”.
आतापर्यंत त्यांची पत्नी लता नावरे यांनी ५१ वेळा तर मुलगा प्रथमेश नावरे याने तीनदा रक्तदान केलं आहे. अशोक नावरे हे दररोज साडेचार तास चालण्याचा व्यायाम करतात. त्यामुळे प्रकृती उत्तम असल्याचं नावरे यांनी सांगितलं. अशोक नावरे सध्या दमाणी ब्लड बँकेत प्रशासन अधिकारी म्हणून काम करतात.
- अमोल सिताफळे.
नावरे सांगतात, “कॉलेजात असताना एकदा रक्तपेढीला भेट दिली होती. तिथं रक्त मिळवण्यासाठी गर्दी जमली होती. अनेक गरजवंत लोक तेव्हा रक्तासाठी रक्तदात्यांच्या पाया पडत होते. हे विदारक चित्र पाहून माझं मन हेलावलं. आणि तेव्हाच आपणही रक्तदान करून एखाद्याचा जीव वाचवू शकतो हा विचार मनात आला आणि त्या दिवसापासून मी रक्तदान करण्यास सुरुवात केली”.
ते पुढं म्हणतात, “दोनशेवेळा रक्तदान करणारा भारतातला मी बहुधा पहिलाच असेन. आतापर्यंत दोनशे पाचवेळा मी रक्तदान केलेले आहे. या कार्यामुळे महाराष्ट्र शासनाने मला शतकवीर म्हणून गौरवलं आहे. रक्तदाना पासून मला मोठे मानसिक समाधान मिळते. रक्तदानाची किंमत पैशात मोजता येत नाही. रक्तदान करण्यात आता माझं कुटुंबही पुढं येत आहे. समाजातही रक्तदान करण्यात मोठी जागरूकता निर्माण होत आहे”.
आतापर्यंत त्यांची पत्नी लता नावरे यांनी ५१ वेळा तर मुलगा प्रथमेश नावरे याने तीनदा रक्तदान केलं आहे. अशोक नावरे हे दररोज साडेचार तास चालण्याचा व्यायाम करतात. त्यामुळे प्रकृती उत्तम असल्याचं नावरे यांनी सांगितलं. अशोक नावरे सध्या दमाणी ब्लड बँकेत प्रशासन अधिकारी म्हणून काम करतात.
- अमोल सिताफळे.
No comments:
Post a Comment