भंडारा तालुक्यातल्या निमगावातले संजय एकापुरे. त्यांची ११ एकर शेती. प्लॅस्टिक मल्चिंग पेपरला त्यांनी तनिसचा (धान्य काढल्यावर उरलेल्या लोम्ब्या ) पर्याय शोधून लाखात नफा कमावला आहे. प्रगत शेतीत मल्चिंग पेपर महत्त्वाचा घटक. बाष्पीभवन रोखणं, तण वाढू न देणं, खतांच्या वापरात बचत, असे त्याचे अनेक फायदे. पण प्लॅस्टिक पर्यावरणाला घातक. तनिसमुळे मुळांना थंडपणा मिळतो. तसंच मुळाजवळ तण उगवत नाही.

पहिल्यात तोड्यात २०० किलो, दुसऱ्या तोड्यात ३०० किलो तर तिसऱ्या तोड्यात ४०० किलो उत्पादन मिळालं. सरासरी १४ रुपये किलोप्रमाणे त्याची विक्री झाली.
उन्हाळ्यामुळे काकडीची लागवड बांबूचा आधार न देता केली. जमिनीवर वेल वाळविल्यानं एकरी बांबूचा १० हजारांचा खर्च वाचला तर मल्चिंगचा वापर न करता तनिस टाकल्यानं एकरी १२ हजारांचा खर्च वाचला. उत्पादन खर्च कमी आल्यानं दोन एकरातून साधारणतः ३ टन काकडीचं उत्पादन. सुमारे ३ लाखांवर उत्पन्न. मजुरी खर्च आणि औषधाचा खर्च वगळता अडीच लाख रुपयांचा निव्वळ नफा.
तनिसचा वापर पुढे खत म्हणूनही होणार आहे.
संजय यांच्या प्रयोगाची पाहणी करण्यासाठी परिसरातले शेतकरी येत असून आपल्या शेतातही असाच प्रयोग करणार असल्याचं ते सांगतात. पर्यावरणपूरक, विषमुक्त शेती करण्याचं संजय यांनी ठरवलं आहे. लहरी हवामान, खतांच्या वाढत्या किंमती यातून मार्ग काढायचा असेल तर आधुनिक शेतीची कास धरली पाहिजे असं ते सांगतात.
-हर्षा रोटकर.
No comments:
Post a Comment