Tuesday 12 February 2019

जालन्याहून मुंबईत भाजीपाला विक्री

तर मित्रांनो हे आहे जालना रेल्वे स्टेशनवरचे दृश्य. फोटोत दिसणाऱ्या या बायका आठवड्यातून कमीत कमी 2 वेळेस मुंबईला जातात. हरभरा भाजी, बेल आणि बोरं हे सगळं विकण्यासाठी घेऊन जातात.
फोटोत दिसणार्‍या एकेका गाठोड्यात बोरांच्या १७ पिशव्या असतात. आणि प्रत्येक पिशवी साधारण एक किलो वजनाची. हे सगळं सकाळी त्या मार्केटमध्ये व्यापाऱ्यांना विकतात. यातून ३५०० ते ४००० रुपयांपर्यंत त्यांना एका दिवसाचं उत्पन्न मिळतं. काहीवेळा स्वतःच भाजी विकून मिळेल तश्या रेल्वेने परत निघतात.


 अर्थात हा प्रवास सोपा नाहीच. रात्री १० ता सकाळी ७ असा नऊ तासांचा. प्रवास करून त्या मुंबईत पोहोचतात. भाजी विकून त्याच रात्री उलटमार्गाचा प्रवास सुरु होतो. गरजेनुसार कधी वडापाववर भूक भागवतात. तर कधी येतांना सोबत आणलेली चटणी-भाकरी असतेच...
एकीकडे, बेरोजगारांचं प्रमाण वाढताना दिसत आहे. काम नाही म्हणून हातावर हात ठेवून बसलेले तरूणही दिसतात. पण इथं, मात्र मुंबईसारख्या महानगरात काय विकलं जाईल याची चाचपणी करून या महिलांनी स्वतःचं घर सावरलं आहे.
- अनंत साळी, जालना

No comments:

Post a Comment