कोणीही विमान जवळून पाहिलंच नव्हतं. मुलांनीच काय, त्यांच्या घरातल्यांनी,आजूबाजूच्यांनी, अगदी शिक्षकांनीसुद्धा. पण मुलांना गगनभरारी घ्यायची होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातली, सावंतवाडी तालुक्यातली कुणेकरी गावची शाळा. त्यातली सातवीतली १२ मुलं. 'स्वप्न पाहणारा माणूस' हा धडा वर्गात शिकणं सुरू होतं. मुलांच्या स्वप्नांबाबत गप्पा सुरू झाल्या. यातूनच विमानप्रवासाचं स्वप्न पाहिलं गेलं. मुंबईपर्यंत रेल्वेनं प्रवास तर मुंबई- गोवा विमानप्रवास. शाळेची साथ होतीच. मुलांनी आपलं स्वप्न जेव्हा घरी सांगितलं, तेव्हा पालकांनी मुलांना आणि शाळेलाही वेड्यातच काढलं.
मुलांचा मात्र स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याचा ठाम निश्चय. त्यासाठी मग सुरू केलं 'शिवाजी मिशन'. पालकांना परवानगीसाठी तयार करणं आणि विमानप्रवासासाठी पैसा मिळवणं, तोही स्वकमाईतून. मिशन कठीण होतं पण सोबत होती शिक्षकांची. कमाईसाठी भातकापणी, नारळ-फुलं विकणं , शिमगोत्सवात नाचगाणी अशी धडपड सुरू होती. ती पाहून पालक , ग्रामस्थ , शिक्षक सर्वांनाच हुरूप येत होता. हळूहळू मुलांच्या स्वप्नाला प्रसिद्धी मिळू लागली. चर्चा रंगू लागली. पालकमंत्री दीपक केसरकरांपर्यंत ती पोहोचली. त्यांनाही कौतुक वाटलं . मुंबईत राहण्याची आणि पर्यटनस्थळं पाहण्याची व्यवस्था त्यांनी केली.
मुंबईतल्या कुणेकरी गावच्या मंडळानंही मदत केली. गावातल्याच राकेश गुंजाळ ,राहुल आणि हर्षल कदम यांनी तिकीट बुकिंगसाठी मदत केली . विमान तिकीट २२०० रुपये. शिवाजी मिशनमधून पैसे जमले होते. थोडे पालकांनीही दिले. मार्चमध्ये मुलांचं स्वप्न प्रत्यक्षात उतरलं. गोव्याला पोहोचल्यावर सावंतवाडीपर्यंत येण्यासाठी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर यांनी बसची व्यवस्था केली.
स्वप्न साकारण्यासाठी मेहनतीची जोड दिली तर ते सहजसाध्य होऊ शकतं. हा चिमुकल्या वयात मिळालेला अनुभव मुलांना भावी आयुष्यात कामी येईल.
मुलांचा मात्र स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याचा ठाम निश्चय. त्यासाठी मग सुरू केलं 'शिवाजी मिशन'. पालकांना परवानगीसाठी तयार करणं आणि विमानप्रवासासाठी पैसा मिळवणं, तोही स्वकमाईतून. मिशन कठीण होतं पण सोबत होती शिक्षकांची. कमाईसाठी भातकापणी, नारळ-फुलं विकणं , शिमगोत्सवात नाचगाणी अशी धडपड सुरू होती. ती पाहून पालक , ग्रामस्थ , शिक्षक सर्वांनाच हुरूप येत होता. हळूहळू मुलांच्या स्वप्नाला प्रसिद्धी मिळू लागली. चर्चा रंगू लागली. पालकमंत्री दीपक केसरकरांपर्यंत ती पोहोचली. त्यांनाही कौतुक वाटलं . मुंबईत राहण्याची आणि पर्यटनस्थळं पाहण्याची व्यवस्था त्यांनी केली.
मुंबईतल्या कुणेकरी गावच्या मंडळानंही मदत केली. गावातल्याच राकेश गुंजाळ ,राहुल आणि हर्षल कदम यांनी तिकीट बुकिंगसाठी मदत केली . विमान तिकीट २२०० रुपये. शिवाजी मिशनमधून पैसे जमले होते. थोडे पालकांनीही दिले. मार्चमध्ये मुलांचं स्वप्न प्रत्यक्षात उतरलं. गोव्याला पोहोचल्यावर सावंतवाडीपर्यंत येण्यासाठी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर यांनी बसची व्यवस्था केली.
स्वप्न साकारण्यासाठी मेहनतीची जोड दिली तर ते सहजसाध्य होऊ शकतं. हा चिमुकल्या वयात मिळालेला अनुभव मुलांना भावी आयुष्यात कामी येईल.
No comments:
Post a Comment