

बियाण्यांचं जतन आणि देवाणघेवाण उत्सवासारखं साजरं करणं म्हणजेच बीजोत्सव. बीजोत्सवच्या माध्यमातून सेंद्रिय शेतकरी, ग्राहक आणि ह्या चळवळीला हातभार लावणारे लोक एकत्र येतात. आणि अनुभवांची देवाणघेवाण करून पुढच्या वर्षीच्या नियोजनाला लागतात. हे गेली पाच वर्ष सुरु आहे. हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या लोकांपासून बिजोत्सवाची सुरुवात झाली. आता ह्या उपक्रमात शेकडोने लोक सहभागी होताना दिसतात. इथे तरुणांचा उत्स्फुर्त सहभाग आहे. बियाण्यांवर अधिकार शेतकऱ्यांचाच असावा असा आग्रह धरणारे हे तरुण. आज आणि उद्या सगळ्यांनाच विषमुक्त अन्न मिळो, ही संकल्पना लोकांपर्यंत पोचवणं हेच बिजोत्सवाचं मुख्य काम.
अन्नाची गरज आपल्याला रोजच भासते. तेव्हा बीजोत्सवसारख्या एका वेगळ्या प्रयत्नाबद्दल आपण जाणून घ्यायला हवं. एक गोष्ट आपण सहज करू शकतो. ते म्हणजे अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना भेटणं, त्यांच्या कामाला बळ देणं, त्यांचे अनुभव जाणून घेणं. आपण ग्राहक असलो म्हणून काय झालं, मला विषमुक्त अन्नसेवन करण्याचा अधिकार आहे, हे कोणीच नाकारू शकत नाही...
भविष्यातल्या पिढीलाही ‘विषमुक्त अन्न मिळो’ ही अपेक्षा ठेऊन बिजोत्सव कार्यकर्ते जोमाने काम करत आहेत. आपणही या प्रवासात जरूर सामील व्हायला हवे.
भविष्यातल्या पिढीलाही ‘विषमुक्त अन्न मिळो’ ही अपेक्षा ठेऊन बिजोत्सव कार्यकर्ते जोमाने काम करत आहेत. आपणही या प्रवासात जरूर सामील व्हायला हवे.
- तेजश्री कांबळे.
No comments:
Post a Comment