एक दिवस बालसुधारगृहातील अधिका-यांचा 'सावली'अनाथाश्रमाच्या नितेश बनसोडे यांना फोन आला. त्यांनी अजयला सावलीत नेण्याचा आग्रह केला. नितेश यांनी लगेच कागदपत्रांची पूर्तता करून अजयची सुटका केली. त्यावेळी त्याचं वय होतं नऊ वर्ष. या दरम्यान त्याचं शिक्षण काहीच झालं नव्हतं. सावलीत आला तेव्हा खूप अशक्त, शांत आणि एकटा एकटा राहत होता. अशा वेळी त्याला सावरणं सावलीसमोरचं मोठं आव्हान होतं. बनसोडे यांनी ते स्वीकारलं अन पेललं देखील! अजय म्हणतो, मी सावलीत आलो नसतो तर माझ्यावर मारलेला गुन्हेगारीचा शिक्का कधीच पुसला गेला नसता.
आता अजॅयमध्ये बदल होऊ लागले आहेत. मुख्य म्हणजे त्याची शाळा सुरु झाली आहे. आणि सावलीच्या विविध उपक्रमात हिरारीनं भाग घेत आहे.
आता अजॅयमध्ये बदल होऊ लागले आहेत. मुख्य म्हणजे त्याची शाळा सुरु झाली आहे. आणि सावलीच्या विविध उपक्रमात हिरारीनं भाग घेत आहे.
बाळू भांगरे,
No comments:
Post a Comment