एखाद्या फार्मवर बैलगाडी, ट्रक्टर सैर करायची, हुरडा खायचा किंवा क्वचित कुणाच्या शेतात खास भातलावणीसाठी जायचं, ही झाली शहरात राहणाऱ्यांसाठी शेताची ओळख. आणि शहराच्या आसपास राहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा झाला किफायतशीर व्यवसाय. सध्या पुण्या-मुंबईच्या आसपास तर अशा ऍग्रो टुरिझमचं पेवच फुटलेलं आहे.

एकीकडे चांगले पीक होत नाही, पिकाला भाव नाही, कर्ज कसे फेडायचे ही विवंचना. तरीही शेतकऱ्यांना या युवकांनी शेतीविकासाचा धडा दिला. आणि त्यातून रोजगारही उपलब्ध केला आहे.
आज अनेक पर्यटक त्यांनी फुलविलेल्या शेतीत पर्यटनाला जात आहेत. या तरूणांकडे शिक्षण आहे. पण नोकरी नाही़. मग नुसतेच रडत बसण्यापेक्षा काही तरी नवीन करून दाखवायचे या उद्देशाने त्यांनी एकत्र येत पडिक शेत विकत घेतलं. राजुरापासून आठ किमीवरच्या चनाखा येथे त्यांनी शेती घेतली. इथंच आल्याचं विक्रमी उत्पादन घेतलं आणि बाकी शेतकऱ्यांचं लक्ष या मुलांकडे वेधलं गेलं. मग याच शेतीला त्यांनी कृषी पर्यटनाची साथ दिली. शेतात त्यांनी लहान मुलांकरिता बैलबंडीची सैर, झाडावरील झुले, कॉर्न पार्टी असा उपक्रम राबवून शेताला पर्यटनाचे स्थळ बनविण्याचा प्रयत्न केला आहे. मुलांसाठी खेळण्याचे मैदान, मोठ्यासाठी खेळण्याचे साहित्य, मचाण अशा गोष्टी शेतात तयार केल्या आहेत. बच्चेकंपनीसह मोठेही या शेतात पर्यटनासाठी येत आहेत.
पर्यटकांकडून प्रवेश शुल्क घेतले जाते. शिवाय शेतात हुर्डा पार्टी, जेवण आदी तयार करून दिले जाते. त्यामुळे पर्यटकांचा ओघ कृषी पर्यटनाकडे वाढला आहे. आणि या तरुणांना रोजगारही गवसला आहे.-
पर्यटकांकडून प्रवेश शुल्क घेतले जाते. शिवाय शेतात हुर्डा पार्टी, जेवण आदी तयार करून दिले जाते. त्यामुळे पर्यटकांचा ओघ कृषी पर्यटनाकडे वाढला आहे. आणि या तरुणांना रोजगारही गवसला आहे.-
प्रशांत देवतळे.
No comments:
Post a Comment