शाळा म्हटली की माझ्या डोळ्यासमोर कितीतरी गोष्टी उभ्या राहतात. माझ्या शाळेचे नाव लोकमान्य कन्या विद्यालय, वरोरा. मी १९८७ ते १९९६ पर्यंत शाळेत जात असे. आनंदवनपासून पाच किलोमीटर दूरवर ही शाळा होती. आम्ही पहिले सायकल रिक्षा आणि मग जुन्या जोंगाने शाळेत जात असू. आईवडिलांना आम्हाला जगातील कुठल्याही चांगल्या शाळेत घालता आले असते पण त्यांनी हीच शाळा निवडली त्याचे कारण शाळेत मराठी मिडीयम होते आणि आमच्या सारख्याच आर्थिक परिस्थितीतील इतरही मुली होत्या आणि मुख्यतः: बऱ्याच मुली गरीबही होत्या. आमच्यात empathy सारख्या महत्वाच्या भविष्यातील उपयोगाच्या skills develop करण्यासाठी त्यांनी आम्हाला या शाळेत घातले.
लाल कौलांची आमची छोटीशी बसकी शाळा, आमचे मोडके डेस्क बेंच, अतिप्रचंड ग्राउंड उत्तम शिक्षक, सतत आमच्या शाळेत डोकावून पाहणारी बाजूच्या मुलांच्या शाळेतील मुले, आमचा रणगाडा ( जुनी जीप ज्यातून आम्ही शाळेत जात असू) आणि लाल -पांढऱ्या स्कर्ट ब्लाउज मध्ये दप्तर हातात धरून जाणाऱ्या माझ्या मैत्रिणी. आमची शाळा गरीब असली तरी आम्हाला सुजाण नागरिक बनविण्यासाठी लागणारे सामाजिक शिक्षण देण्यास समर्थ होती. शिक्षणाचा शाळेने कधी बाऊ केला नाही किंवा शाळेचे कधी पेपरात जाहिरातींद्वारे कोडकौतुक झालेले मला आठवत नाही. किंबहुना उत्तम शिक्षण, सुजाण शिक्षक, मनापासून शिकणारे विद्यार्थी आणि आवश्यक तेवढेच शिक्षणेतर कार्यक्रम असे optimum पॅकेज होते. त्यात कधी आम्ही झाडे लावताना झाडांपेक्षा कॅमेऱ्याकडे जास्त लक्ष देऊन पर्यावरण दिन साजरा केला नाही की सोशल वर्क नावाखाली गरीब मुलांना आपलेच फाटलेले कपडे अगदी संकोचाने वाटले नाहीत. पण खेड्यातील मुलींसोबतच शिकलो आणि त्यांच्यात मिसळलो. मी तर सातवीपासून मागच्याच बेंचवर प्रतिभा नावाच्या मुलीसोबत बसत असे. ती आठ किलोमीटर वरून चालत येई पण रोज डब्यात माझ्यासाठी एक भाकर जास्त आणी. आपल्या डब्यापेक्षा तिच्याच डब्यातील भाकर जास्त खाल्ल्याचे मला आठवते. त्याबदल्यात मी तिला शिक्षणातील कठीण संकल्पना शिकवीत असे. त्यामुळे गरीब, मध्यमवर्गीय असा भेदभाव राहिला नाही. 'ते' आणि 'आम्ही' असाही भेद राहिला नाही.
आज माझा मुलगा जेव्हा शाळेत जातो तेव्हा चित्र पूर्ण बदलले आहे. शिक्षणक्षेत्र हा बाजार झालेला आहे. आमची जुनी शाळा सेमी इंग्लिश झाली आहे. मराठी माध्यमाची चांगली शाळा शोधणे हा महत्प्रयासाचा कार्यक्रम होता. एकतर आम्ही आनंदवनात राहतो तिथे शाळा कमी आणि त्यातच सर्व शाळा अर्धवट इंग्लिश, म्हणजे संपूर्ण माध्यम एका भाषेत नाही. त्यामुळे फार अडचण व्हायला लागली. मुलाच्या बाबतीत दोन तीन वर्ष चांगली शाळा शोधली. पण सर्व शाळांमध्ये काही ना काही प्रश्न असल्याने त्याला सध्यातरी जवळच्या शाळेतच घालण्याचा निर्णय घेतला. ही शाळा फार मोठी नाही, पण मोठाल्या कॉर्पोरेट शाळांसारखे इथे प्रश्न तरी येऊ नयेत. परवाच एक मैत्रीण तिच्या मुलांबद्दल सांगत होती की हल्ली अगदी मुलांमधल्या चर्चा म्हणजे फोन. 'माझ्या आईकडे apple फोन आहे आणि तुझ्या आईकडे vivo ' यावरून दोघांचे उच्च-नीचता ठरविण्याबद्दल भांडण झाले. त्यांच्याकडे सोशल वर्कच्या तासात आजूबाजूची गरिबी दाखवून आणतात आणि पर्यावरणावर भाष्य करतात. एक झाड लावून त्यापुढे काहीच होत नाही. त्या झाडाचे कुणाला पडलेले नसते, फक्त शाळेच्या रिपोर्टमध्ये एक ऍक्टिव्हिटी म्हणून ते केले जाते. मुलांना दप्तराचे ओझे आणि त्यावर आईवडिलांच्या अपेक्षांचे टेन्शन. अश्या बऱ्याच चर्चा ऐकल्या की सुन्न व्हायला होते.
- डॉ. शीतल आमटे- करजगी मुख्य कार्यकारी अधिकारी,
महारोगी सेवा समिती, वरोरा (आनंदवन)
लाल कौलांची आमची छोटीशी बसकी शाळा, आमचे मोडके डेस्क बेंच, अतिप्रचंड ग्राउंड उत्तम शिक्षक, सतत आमच्या शाळेत डोकावून पाहणारी बाजूच्या मुलांच्या शाळेतील मुले, आमचा रणगाडा ( जुनी जीप ज्यातून आम्ही शाळेत जात असू) आणि लाल -पांढऱ्या स्कर्ट ब्लाउज मध्ये दप्तर हातात धरून जाणाऱ्या माझ्या मैत्रिणी. आमची शाळा गरीब असली तरी आम्हाला सुजाण नागरिक बनविण्यासाठी लागणारे सामाजिक शिक्षण देण्यास समर्थ होती. शिक्षणाचा शाळेने कधी बाऊ केला नाही किंवा शाळेचे कधी पेपरात जाहिरातींद्वारे कोडकौतुक झालेले मला आठवत नाही. किंबहुना उत्तम शिक्षण, सुजाण शिक्षक, मनापासून शिकणारे विद्यार्थी आणि आवश्यक तेवढेच शिक्षणेतर कार्यक्रम असे optimum पॅकेज होते. त्यात कधी आम्ही झाडे लावताना झाडांपेक्षा कॅमेऱ्याकडे जास्त लक्ष देऊन पर्यावरण दिन साजरा केला नाही की सोशल वर्क नावाखाली गरीब मुलांना आपलेच फाटलेले कपडे अगदी संकोचाने वाटले नाहीत. पण खेड्यातील मुलींसोबतच शिकलो आणि त्यांच्यात मिसळलो. मी तर सातवीपासून मागच्याच बेंचवर प्रतिभा नावाच्या मुलीसोबत बसत असे. ती आठ किलोमीटर वरून चालत येई पण रोज डब्यात माझ्यासाठी एक भाकर जास्त आणी. आपल्या डब्यापेक्षा तिच्याच डब्यातील भाकर जास्त खाल्ल्याचे मला आठवते. त्याबदल्यात मी तिला शिक्षणातील कठीण संकल्पना शिकवीत असे. त्यामुळे गरीब, मध्यमवर्गीय असा भेदभाव राहिला नाही. 'ते' आणि 'आम्ही' असाही भेद राहिला नाही.
आज माझा मुलगा जेव्हा शाळेत जातो तेव्हा चित्र पूर्ण बदलले आहे. शिक्षणक्षेत्र हा बाजार झालेला आहे. आमची जुनी शाळा सेमी इंग्लिश झाली आहे. मराठी माध्यमाची चांगली शाळा शोधणे हा महत्प्रयासाचा कार्यक्रम होता. एकतर आम्ही आनंदवनात राहतो तिथे शाळा कमी आणि त्यातच सर्व शाळा अर्धवट इंग्लिश, म्हणजे संपूर्ण माध्यम एका भाषेत नाही. त्यामुळे फार अडचण व्हायला लागली. मुलाच्या बाबतीत दोन तीन वर्ष चांगली शाळा शोधली. पण सर्व शाळांमध्ये काही ना काही प्रश्न असल्याने त्याला सध्यातरी जवळच्या शाळेतच घालण्याचा निर्णय घेतला. ही शाळा फार मोठी नाही, पण मोठाल्या कॉर्पोरेट शाळांसारखे इथे प्रश्न तरी येऊ नयेत. परवाच एक मैत्रीण तिच्या मुलांबद्दल सांगत होती की हल्ली अगदी मुलांमधल्या चर्चा म्हणजे फोन. 'माझ्या आईकडे apple फोन आहे आणि तुझ्या आईकडे vivo ' यावरून दोघांचे उच्च-नीचता ठरविण्याबद्दल भांडण झाले. त्यांच्याकडे सोशल वर्कच्या तासात आजूबाजूची गरिबी दाखवून आणतात आणि पर्यावरणावर भाष्य करतात. एक झाड लावून त्यापुढे काहीच होत नाही. त्या झाडाचे कुणाला पडलेले नसते, फक्त शाळेच्या रिपोर्टमध्ये एक ऍक्टिव्हिटी म्हणून ते केले जाते. मुलांना दप्तराचे ओझे आणि त्यावर आईवडिलांच्या अपेक्षांचे टेन्शन. अश्या बऱ्याच चर्चा ऐकल्या की सुन्न व्हायला होते.
- डॉ. शीतल आमटे- करजगी मुख्य कार्यकारी अधिकारी,
महारोगी सेवा समिती, वरोरा (आनंदवन)
No comments:
Post a Comment