प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये शाळेचं महत्त्व अनन्यसाधारण असतं. प्रत्येकाच्या आयुष्याची जडणघडण आणि विकास शाळेतच होत असतो. मी ग्रामीण भागातल्या शाळेत शिकलो. सुरूवातीला जिल्हा परिषद शाळेत, त्यानंतर अणदूर इथल्या माध्यमिक शाळेत माझं शिक्षण झालं. पण शाळेत नेहमीच्या पाठ्यपुस्तकी शिक्षणाशिवाय इतर उपक्रम असायचे. त्यातूनच खऱ्या अर्थाने आम्हांला एक विश्व पाहायला मिळालं. तेव्हा मी शाळेचा मुख्यमंत्री म्हणून निवडून आलो होतो. मुलांच्या मनामध्ये लोकशाही मूल्यं रूजवण्याचं काम अशा उपक्रमांनी केलं.
शाळेचा मुख्यमंत्री आणि आज बालशिक्षण आयोगाचा अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडतो आहे, यात अर्थातच शाळेचे संस्कार आणि उपक्रम याचाच भाग आहे. त्यामुळे शाळेतल्या अभ्यासेतर उपक्रमांतून विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्त्व घडत असतं, असं मला वाटतं.
No comments:
Post a Comment