Sunday 25 November 2018

माझ्या शाळेनं मला काय दिलं? -सुकांत चक्रदेव, ज्येष्ठ पत्रकार

माझी शाळा रत्नागिरी जिल्ह्यातल्या कुर्धे इथली जिल्हा परिषदेची. दररोज 3-4 किलोमीटरची पायपीट. सोडायला आईवडील नाहीत की रिक्षावाले काका , स्कुल बस नाही. सवंगड्यांसोबत गप्पा मारत शाळेतून जाणंयेणं. 
चिंचा, पेरू, आंबा पाडणं आणि बागायदार किंवा कोणी वडीलधारी बघण्याच्या आधी जीव मुठीत धरून सुसाट पळून जाणं. यातही एक वेगळाच आनंद असायचा. दप्तर म्हणजे खांद्यावर पिशवी. एक-दोन पुस्तकं आणि पाटी यांचंच काय ते ओझं. गुरुजींचा आदर करा, हे सांगण्याची वेळ आमच्या पालकांवर कधीच आली नाही. शाळा सुटल्यावर पोहणं. आल्यावर दिवाबत्ती करणं, काहीतरी खाणं आणि मग अभ्यास. तेव्हा वीज नव्हती. टीव्ही, मोबाइलचा प्रश्नच नव्हता.
पूर्वी म्हणजे 35-40 काहीही साधनं नव्हती तरी मुलं उत्तम शिकली. दप्तरांचं ओझं न ताण न घेता शिकली. आज सगळं काही आहे तरी मुलं तणावाखाली आहेत. का बरं? मुलांना नेमकं हवंय तरी काय? या प्रश्नाचा भुंगा कायम मोठ्यांच्या डोक्यात आहे. मुलांना हवंय मोकळं वातावरण, मात्र तेच नेमकं आज मिळत नाहीये, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
शब्दांकन - जान्हवी पाटील, रत्नागिरी

No comments:

Post a Comment