लग्न म्हटलं की अहेर, भेटवस्तू, हार-तुरे, पुष्पगुच्छ, साड्या, दागिने, कपडेलत्ते आलंच. अलिकडे, देणं-घेणं टाळणं, अहेरही न घेणं, अगदी पुष्पगुच्छही नको, असं काही लग्नांत ठरवून केलं जातं. जालना इथल्या एका नवदांपत्याने लग्नात अहेर स्वीकारला नाहीच. अणि द्यायचंच असेल, तर शालेय मुलांसाठी पेन, वही, पुस्तकं हे शालेयसाहित्य द्या, असं आवाहन लग्नपत्रिकेतून केलं. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद म्हणून, हजाराहून अधिक वह्या,पेनं वगैरे जमा झालं. या साहित्याचं वाटप लवकरच गरीब विद्यार्थ्यांना करण्यात येणार आहे.

अहेरात भेटवस्तू, हारतुरे न घेता त्या ऐवजी गरीब मुलांना देण्यासाठी शैक्षणिक साहित्य स्वीकारावं, हे त्यांना सुचलं आणि त्यांनी ते अंमलात आणलं. आपल्या लग्नपत्रिकेवरच तशी विनंती करून हा विचार त्यांनी पसरवला. दोघांनी आपल्या सहजीवनाची सुरूवातच अशी आगळीवेगळी केली.
ऋषिकेश- दीपाली यांनी भेटवस्तूंवर होणारा खर्च टाळून मंगलप्रसंगी असं सामाजिक कर्तव्य केलं. हे खरोखरच प्रशंसनीय आणि अनुकरणीय आहे.
या दोघांना सगेसोयरे, मित्रमंडळी यांनी शुभेच्छा दिल्या,आशिर्वाद दिले.
उद्या हे शालेय साहित्य ज्या गरीब विद्यार्थ्यांना मिळेल आणि त्यांच्या चेहेऱ्यावर समाधान, हसू फुलेल, ते या नवदंपतीला लाखोगणती आशीर्वादापेक्षा भारी असेल.
- अनंत साळी.
No comments:
Post a Comment