|दुष्काळग्रस्त जिल्ह्याला यावर्षी समाधानकारक पावसाने दिलासा दिला आहे.
आजही नद्या-नाल्यांमध्ये, शेत-शिवारांमध्ये जलसंचय दिसत आहे. जलयुक्त
शिवारच्या झालेल्या कामांमुळे हे सकारात्मक चित्र दिसत आहे. २०११ मध्ये
समाधानकारक पाऊस होऊनही पाण्याचा संचय झाला नव्हता. मराठवाड्यात तुलनेने
उस्मानाबाद जिल्ह्यात अधिक क्षमतेची, दर्जेदार आणि शेतीला उपयुक्त ठरतील,
अशी कामे झाली. यासाठी 'अहिल्याबाई होळकर
जलमीटर पुरस्कार' उस्मानाबाद जिल्ह्याने मिळवला आहे. लोकसहभाग आणि
शासनाच्या पुढाकारातून कळंबच्या मांजरा नदीचे खोलीकरण करण्यात आले होते.
दुसऱ्या वर्षीही हे नदीपात्र सुमारे २२०० मीटर तुडुंब भरले असून, त्यातून
३५० हेक्टर जमिनीला लाभ झाला आहे. शिवाय शहरासह परिसरात भूजल पातळीत वाढ
झाली आहे.लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्याला वरदान ठरलेल्या मांजरा
प्रकल्पावरील मांजरा नदीचे खोलीकरण १० एप्रिल ते १५ जून २०१६ दरम्यान
करण्यात आले. कळंब शहराच्या उत्तरेला असलेल्या या नदीच्या पुनरूज्जीवनासाठी
रोटरी क्लब, व्यापारी संघटना, शहरातील नागरिक आणि शासनाने पुढाकार घेतला
होता. हे काम ६६ दिवसांत पूर्ण झाले. या कामातून ३ लाख, ३० हजार क्युबिक
मीटर गाळ निघाला होता. या गाळातून सुमारे १५० हेक्टर जमीन सुपिक झाली
असल्याचे रोटरी क्लबचे तत्कालीन अध्यक्ष तथा मांजरा नदी पुनरुज्जीवन
समितीचे अध्यक्ष विश्वजीत ठोंबरे यांनी सांगितले.
शहरी भाग असूनही शासनाने पहिल्यांदाच मांजरा नदीच्या खोलीकरणासाठी ८४ लाख, ७ हजार रुपये दिले होते. लोकसहभाग ४० लाख, ४८ हजार, २४ रुपयांचा होता. एकूण १ कोटी, २४ लाख, ५५ हजार, ९० रुपये इतका खर्च झाला. कामानंतर नदीचे पात्र ३ मिटरपर्यंत खोल तसेच ७ मिटरपर्यंत रुंद झाले. नदीमध्ये ३३ कोटी लिटर पाणीसाठा झाला आहे. नदीच्या पुनरूज्जीवनमुळे शहरातील भूजल पातळीत वाढ झाली आहे.
कळंब शहराच्या उत्तरेला असलेल्या या नदीच्या जवळपास सव्वादोन किलोमिटरचा भाग पाण्याने तुडूंब भरलेला आहे. नदीच्या एका बाजूला शहर आणि दुसऱ्या बाजूला शेती, असे चित्र आहे. याच नदीवरून अंबाजोगाई रस्ता जातो. छायाचित्रकार सुखदेव गायके (येरमाळा, ता.कळंब) यांनी ड्रोनद्वारे चित्र टिपल्यानंतर नदीचा विस्तीर्ण परिसर, शेती आणि कळंबचे मनमोहक सौंदर्य दिसत होते.
- चंद्रसेन देशमुख.
शहरी भाग असूनही शासनाने पहिल्यांदाच मांजरा नदीच्या खोलीकरणासाठी ८४ लाख, ७ हजार रुपये दिले होते. लोकसहभाग ४० लाख, ४८ हजार, २४ रुपयांचा होता. एकूण १ कोटी, २४ लाख, ५५ हजार, ९० रुपये इतका खर्च झाला. कामानंतर नदीचे पात्र ३ मिटरपर्यंत खोल तसेच ७ मिटरपर्यंत रुंद झाले. नदीमध्ये ३३ कोटी लिटर पाणीसाठा झाला आहे. नदीच्या पुनरूज्जीवनमुळे शहरातील भूजल पातळीत वाढ झाली आहे.
कळंब शहराच्या उत्तरेला असलेल्या या नदीच्या जवळपास सव्वादोन किलोमिटरचा भाग पाण्याने तुडूंब भरलेला आहे. नदीच्या एका बाजूला शहर आणि दुसऱ्या बाजूला शेती, असे चित्र आहे. याच नदीवरून अंबाजोगाई रस्ता जातो. छायाचित्रकार सुखदेव गायके (येरमाळा, ता.कळंब) यांनी ड्रोनद्वारे चित्र टिपल्यानंतर नदीचा विस्तीर्ण परिसर, शेती आणि कळंबचे मनमोहक सौंदर्य दिसत होते.
- चंद्रसेन देशमुख.
No comments:
Post a Comment