नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातलं गाव लोणखेडा. या ११ हजार
लोकसंख्येच्या गावाच्या ग्रामपंचायतीचा कारभार महिलांच्या हाती आहे.
लोकांनी मोठ्या विश्वासाने ग्रामपंचायतीचा कारभार आपल्याकडे सोपवला आहे,
याची जाणीव असलेल्या, या महिला. शहादा तालुक्यात सुधारणावादी चळवळींचं
वातावरण पूर्वापार आहेच. म्हणूनच, खानदेशात इतरांच्या तुलनेत पुढे
राहणारा. लोणखेडा गावात आदिवासी लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. ग्रामपंचायत चालवणाऱ्या कारभारणींचं गावाचा कायापालट करण्यात मोलाचं योगदान आहे.
गावातल्या आजारांचं मूळ दूषित पाण्यात आहे आणि आजारांना गावातून हद्दपार करण्यासाठी ग्रामस्थांना शुद्ध पाणी दिलंच पाहिजे, या विचाराने प्रेरित झालेल्या शांताबाई भिल या गावाच्या महिला सरपंच आणि अन्य सदस्यांनी गावात तीन ठिकाणी ATM सारखं पाण्याचं ATW मशीन बसवून गावकर्यांना शुद्ध पाणी उपलब्ध करून दिलं आहे.
आपल्या गावाला क्षारयुक्त पाण्याचा पुरवठा होतोय, हे महिलांच्या लक्षात आलं होतं. क्षारयुक्त पाण्यामुळे उद्भवणाऱ्या आजारांना पिटाळण्यासाठी त्यांनी ग्रामपंचायत बैठकीत ठराव करून गावात तीन ठिकाणी पिण्याच्या शुद्ध पाण्याचं मशीन बसवायचं ठरवलं.
गावाच्या उपसरपंच कल्पना पाटील म्हणाल्या, “पाणी शुद्ध करणार्या RO यंत्रणेची देखभाल करण्यासाठी खर्च येणार. तो भागवण्यासाठी आणि फुकटात मिळणार्या वस्तूचं मोल नसतं. म्हणून आम्ही या पाण्याला दर लावायचं ठरवलं.”
ग्रामपंचायतीने गावकर्यांना कार्ड दिलं आहे. एक रुपयात एक लिटर आणि पाच रुपयात सात लिटर पाणी उपलब्ध करून दिलं आहे. या पाण्याचा फायदा लोणखेड्याच्या शेजारची गावंही घेतात. गावात ग्रामपंचायतीने शुद्ध आणि स्वच्छ पाणी उपलब्ध करून दिल्याने खूपच फायदा झाला. आमच्या गावात साथीच्या रोगांचं प्रमाण कमी झाले असल्याचं गावकरी सांगतात. सुजाण स्त्रिया गावाचे प्रश्न निगुतीने सोडवतात, याचं हे ठळक उदाहरण.
गावातल्या आजारांचं मूळ दूषित पाण्यात आहे आणि आजारांना गावातून हद्दपार करण्यासाठी ग्रामस्थांना शुद्ध पाणी दिलंच पाहिजे, या विचाराने प्रेरित झालेल्या शांताबाई भिल या गावाच्या महिला सरपंच आणि अन्य सदस्यांनी गावात तीन ठिकाणी ATM सारखं पाण्याचं ATW मशीन बसवून गावकर्यांना शुद्ध पाणी उपलब्ध करून दिलं आहे.
आपल्या गावाला क्षारयुक्त पाण्याचा पुरवठा होतोय, हे महिलांच्या लक्षात आलं होतं. क्षारयुक्त पाण्यामुळे उद्भवणाऱ्या आजारांना पिटाळण्यासाठी त्यांनी ग्रामपंचायत बैठकीत ठराव करून गावात तीन ठिकाणी पिण्याच्या शुद्ध पाण्याचं मशीन बसवायचं ठरवलं.
गावाच्या उपसरपंच कल्पना पाटील म्हणाल्या, “पाणी शुद्ध करणार्या RO यंत्रणेची देखभाल करण्यासाठी खर्च येणार. तो भागवण्यासाठी आणि फुकटात मिळणार्या वस्तूचं मोल नसतं. म्हणून आम्ही या पाण्याला दर लावायचं ठरवलं.”
ग्रामपंचायतीने गावकर्यांना कार्ड दिलं आहे. एक रुपयात एक लिटर आणि पाच रुपयात सात लिटर पाणी उपलब्ध करून दिलं आहे. या पाण्याचा फायदा लोणखेड्याच्या शेजारची गावंही घेतात. गावात ग्रामपंचायतीने शुद्ध आणि स्वच्छ पाणी उपलब्ध करून दिल्याने खूपच फायदा झाला. आमच्या गावात साथीच्या रोगांचं प्रमाण कमी झाले असल्याचं गावकरी सांगतात. सुजाण स्त्रिया गावाचे प्रश्न निगुतीने सोडवतात, याचं हे ठळक उदाहरण.
- कावेरी परदेशी.
No comments:
Post a Comment