.
"कुणी दारात बी उभं नाय करत हो, आमच्या पोरायला... निस्ते हिंडत असतेत गावभर" असं म्हणणारे बाबा काल सांगत होते, "आता अंघोळ करतेत, तुम्ही केस कापिल्यापासून नीट भांग पाडितेत पोरं... फरक पडायला लागलाय...!"
जालना जिल्ह्यातील अंबड इथंल्या 'हसरी खेळती आनंददायी शाळे'त जाणाऱ्या मुलांचे पालक सांगत होते. भंगार गोळा करणारे हात आता clap clap म्हणतात, भीक मागणारी झोळी आता वह्या पुस्तकांनी भरलीय, कुणी गाण्याच्या चालीवर हात वर करून नाचतंय, May I come, sit down, stand up हे संकेतही समजू लागलेत या चिमुकल्याना शाळेमुळे.
हातावर पोट भरणारे वैफु, फुलवारी, गोसावी, रायरंड जमातीचे लोक म्हणजे या मुलांचे पालक. भटकी जमात. त्यामुळे मुलांवर लक्ष देण्यासाठी वेळच नाही. शाळा, शिक्षण नाही. त्यामुळे मुलांचं भविष्य अंधकारमय. हे टिपलं 'समाजभान'च्या दादासाहेब थेटे आणि त्यांच्या मित्रांनी. मागच्या दिवाळीतच त्यांनी पालावरच्या या भटक्यांसाठी 'एक दिवा पेटवूया, चला दिवाळी साजरी करूया' हा उपक्रम आयोजित केला होता. त्यावेळी जाणवलं की, या वंचित लोकांच्या आयुष्यात आलेल्या अंधकारामागे त्यांचं अज्ञान आणि निरक्षरता आहे. म्हणून त्या पालांचा सर्वे करण्यात आला. लोकांना शिक्षणाचं महत्व पटवून मुलांच्या शिक्षणासाठी प्रवृत्त करण्यात आलं. त्यांची मानसिकता तयार झाल्यानंतर पाचोड रोडवर त्यांच्या झोपड्यांच्याा परिसरातच 'हसरी खेळती आनंददायी शाळा' सुरु करण्याचा निर्णय 'समाजभान टीम'कडून घेण्यात आला. समविचारी एक झाले. त्यामुळे आर्थिक गणित जुळलं. आणि वंचितांची हसरी शाळा सुरु झाली.
शाळा तर सुरू झाली. पण शिक्षकांचं काय? परिसरातलं वातवरण पाहून बऱ्याच शिक्षकांनी तिथे येण्यास नकार दिला. पुढे सारिका गिरी आणि मंजुषा एडके या तयार झाल्या.14 एप्रिल 2017 रोजी शाळेचा मुहूर्त झाला. तेव्हापासून नियमितपणे सकाळी 8:30 ते 10 या वेळेत वस्तीत शाळा भरू लागली. परिसरात एकूण 100 ते 150 मुलं. पैकी 42 मुलं आज शाळेत येऊ लागली आहेत. सुरुवातीला वाढलेले केस घेऊन मुलं आहे तशी शाळेत येत. वेशभूषेपासून त्यांच्यात संस्कार हवेत, म्हणून पहिली पायरी केस व्यवस्थित कापण्याची झाली. आणि मग पुढे चालू झाला आनंदमय शाळेचा प्रवास...!!
'समाजभान टीम'मध्ये सहकार्य करणारे निलेश लोहिया, संतोष वरकड, गितराम मते, प्रकाश शेळके, विजय शेळके, रामेश्वर खापरे, सनी खरात, संतोष मकासरे, हनुमान कवडे, नितीन गिल्डा, तुकाराम जमदारे, अनिल खडके, दत्ता शिनगारे, सतीश शिनगारे, राहुल खरात, संतोष जिगे असे अनेकजण सहकार्य करत आहेत.
‘हसरी खेळती आनंददायी शाळा’ या मुलांना शिक्षणाची आवड निर्माण करायला आजच्या घडीला बऱ्याच अंशी यशस्वी झालीय. एरवी उन्हाळी सुट्ट्या ही संकल्पनाच माहित नसलेली मुलं सध्या १५ जूनची वाट पाहताहेत. खऱ्याखुऱ्या शाळेच्या विश्वात प्रवेश करायला...
दादासाहे थेटे यांचा संपर्क क्र. - 9764042323
- अनंत साळी.
"कुणी दारात बी उभं नाय करत हो, आमच्या पोरायला... निस्ते हिंडत असतेत गावभर" असं म्हणणारे बाबा काल सांगत होते, "आता अंघोळ करतेत, तुम्ही केस कापिल्यापासून नीट भांग पाडितेत पोरं... फरक पडायला लागलाय...!"
जालना जिल्ह्यातील अंबड इथंल्या 'हसरी खेळती आनंददायी शाळे'त जाणाऱ्या मुलांचे पालक सांगत होते. भंगार गोळा करणारे हात आता clap clap म्हणतात, भीक मागणारी झोळी आता वह्या पुस्तकांनी भरलीय, कुणी गाण्याच्या चालीवर हात वर करून नाचतंय, May I come, sit down, stand up हे संकेतही समजू लागलेत या चिमुकल्याना शाळेमुळे.
हातावर पोट भरणारे वैफु, फुलवारी, गोसावी, रायरंड जमातीचे लोक म्हणजे या मुलांचे पालक. भटकी जमात. त्यामुळे मुलांवर लक्ष देण्यासाठी वेळच नाही. शाळा, शिक्षण नाही. त्यामुळे मुलांचं भविष्य अंधकारमय. हे टिपलं 'समाजभान'च्या दादासाहेब थेटे आणि त्यांच्या मित्रांनी. मागच्या दिवाळीतच त्यांनी पालावरच्या या भटक्यांसाठी 'एक दिवा पेटवूया, चला दिवाळी साजरी करूया' हा उपक्रम आयोजित केला होता. त्यावेळी जाणवलं की, या वंचित लोकांच्या आयुष्यात आलेल्या अंधकारामागे त्यांचं अज्ञान आणि निरक्षरता आहे. म्हणून त्या पालांचा सर्वे करण्यात आला. लोकांना शिक्षणाचं महत्व पटवून मुलांच्या शिक्षणासाठी प्रवृत्त करण्यात आलं. त्यांची मानसिकता तयार झाल्यानंतर पाचोड रोडवर त्यांच्या झोपड्यांच्याा परिसरातच 'हसरी खेळती आनंददायी शाळा' सुरु करण्याचा निर्णय 'समाजभान टीम'कडून घेण्यात आला. समविचारी एक झाले. त्यामुळे आर्थिक गणित जुळलं. आणि वंचितांची हसरी शाळा सुरु झाली.
शाळा तर सुरू झाली. पण शिक्षकांचं काय? परिसरातलं वातवरण पाहून बऱ्याच शिक्षकांनी तिथे येण्यास नकार दिला. पुढे सारिका गिरी आणि मंजुषा एडके या तयार झाल्या.14 एप्रिल 2017 रोजी शाळेचा मुहूर्त झाला. तेव्हापासून नियमितपणे सकाळी 8:30 ते 10 या वेळेत वस्तीत शाळा भरू लागली. परिसरात एकूण 100 ते 150 मुलं. पैकी 42 मुलं आज शाळेत येऊ लागली आहेत. सुरुवातीला वाढलेले केस घेऊन मुलं आहे तशी शाळेत येत. वेशभूषेपासून त्यांच्यात संस्कार हवेत, म्हणून पहिली पायरी केस व्यवस्थित कापण्याची झाली. आणि मग पुढे चालू झाला आनंदमय शाळेचा प्रवास...!!
'समाजभान टीम'मध्ये सहकार्य करणारे निलेश लोहिया, संतोष वरकड, गितराम मते, प्रकाश शेळके, विजय शेळके, रामेश्वर खापरे, सनी खरात, संतोष मकासरे, हनुमान कवडे, नितीन गिल्डा, तुकाराम जमदारे, अनिल खडके, दत्ता शिनगारे, सतीश शिनगारे, राहुल खरात, संतोष जिगे असे अनेकजण सहकार्य करत आहेत.
‘हसरी खेळती आनंददायी शाळा’ या मुलांना शिक्षणाची आवड निर्माण करायला आजच्या घडीला बऱ्याच अंशी यशस्वी झालीय. एरवी उन्हाळी सुट्ट्या ही संकल्पनाच माहित नसलेली मुलं सध्या १५ जूनची वाट पाहताहेत. खऱ्याखुऱ्या शाळेच्या विश्वात प्रवेश करायला...
दादासाहे थेटे यांचा संपर्क क्र. - 9764042323
- अनंत साळी.
No comments:
Post a Comment