सोलापूर शहरातल्या विडी घरकुलात राहणारे साईनाथ वंगारी. वय ३३. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा ते उत्तीर्ण झाले आणि नुकतीच त्यांची महिला आणि बालविकास अधिकारी (' ब ' गट ) म्हणून निवड झाली आहे.
साईनाथ यांचं बालपण हलाखीत गेलं . घरी शिक्षणाचे कोणतेही वारे नसतानाही ते स्वतः शिकले. त्यांची आई विडी कामगार. साईनाथ लहानपणी कारखान्यात कामाला जाऊन घरी मदत करायचे. मेडिकलमध्ये स्टोअर्समध्ये स्टोअर बॉय म्हणून काम करत ते दहावी आणि बारावी पास झाले. खासगी कामात काही राम वाटत नव्हता. सरकारी नोकरीसाठी प्रयत्न सुरू झाले.
२००८ साली सरळ सेवा परीक्षा देऊन शिपाई. नोकरी करताकरता अर्थशास्त्रात एम.ए. दररोजच्या सहवासातून अधिकाऱ्यांपासून प्रेरणा मिळत होती. साईनाथ यांच्यासमोर आता स्वप्न होतं अधिकारी होण्याचं. नोकरी आणि प्रपंच सांभाळत २०१५ मध्ये पुन्हा अभ्यास सुरू केला. कन्ना चौक इथल्या पूर्व भाग सार्वजनिक वाचनालयाच्या अभ्यासिकेत रोज सहा तास. अभ्यासानंतर काही वेळ मित्रांसोबत वेगवेगळ्या विषयांवर गटचर्चा. रात्र अभ्यासिकेचाही आधार. तरीही सुरुवात अपयशानं झाली. नोव्हेंबर २०१७ मध्ये पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत अवघ्या दोन गुणांनी हुलकावणी. त्यानंतर करनिर्धारण अधिकारी, केंद्रीय पोलीस उपनिरीक्षक या परीक्षेतही यश थोडक्यात हुकले. तरीही साईनाथ यांनी जिद्द आणि मेहनत सोडली नाही. अखेर २०१९ मध्ये यश मिळालंच.
''कोणतंही यश मिळवायचं असेल तर कठीण परिश्रमाशिवाय पर्याय नाही.'' साईनाथ सांगतात. ''अपयशानं खचून जायचं नसतं. संयम, जिद्द आणि चिकाटीनं परिस्थितीवर मात करायची असते.''
आपल्या यशात कुटुंबाचा मोठा वाटा असल्याचं ते सांगतात.
२००८ साली सरळ सेवा परीक्षा देऊन शिपाई. नोकरी करताकरता अर्थशास्त्रात एम.ए. दररोजच्या सहवासातून अधिकाऱ्यांपासून प्रेरणा मिळत होती. साईनाथ यांच्यासमोर आता स्वप्न होतं अधिकारी होण्याचं. नोकरी आणि प्रपंच सांभाळत २०१५ मध्ये पुन्हा अभ्यास सुरू केला. कन्ना चौक इथल्या पूर्व भाग सार्वजनिक वाचनालयाच्या अभ्यासिकेत रोज सहा तास. अभ्यासानंतर काही वेळ मित्रांसोबत वेगवेगळ्या विषयांवर गटचर्चा. रात्र अभ्यासिकेचाही आधार. तरीही सुरुवात अपयशानं झाली. नोव्हेंबर २०१७ मध्ये पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत अवघ्या दोन गुणांनी हुलकावणी. त्यानंतर करनिर्धारण अधिकारी, केंद्रीय पोलीस उपनिरीक्षक या परीक्षेतही यश थोडक्यात हुकले. तरीही साईनाथ यांनी जिद्द आणि मेहनत सोडली नाही. अखेर २०१९ मध्ये यश मिळालंच.
''कोणतंही यश मिळवायचं असेल तर कठीण परिश्रमाशिवाय पर्याय नाही.'' साईनाथ सांगतात. ''अपयशानं खचून जायचं नसतं. संयम, जिद्द आणि चिकाटीनं परिस्थितीवर मात करायची असते.''
आपल्या यशात कुटुंबाचा मोठा वाटा असल्याचं ते सांगतात.
- अमोल सीताफळे, सोलापूर
No comments:
Post a Comment