बुलडाणा जिल्ह्यातले संग्रामपूर, जळगाव जामोद, शेगाव आणि नांदुरा हे चार तालुके. आवश्यकतेपेक्षा जास्त पाण्याचा उपसा झालेले. त्यामुळे पाणीपातळी अतिशय खालावलेली. इथे मिळणारं पाणी क्षारयुक्त. तब्बल १२४ गावातली परिस्थिती गंभीर. मूत्रपिंडाच्या आजारानं अनेक जण ग्रासलेलं.
गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जामोद आणि संग्रामपूर या तालुक्यांची निवड जलशक्ती अभियानातंर्गत करण्यात आली आहे. जलपुनर्भरण , जलसंवर्धनाबाबत जागृती करण्यासाठी हे अभियान. जिल्हाधिकारी डॉ निरुपमा डांगे यांनी या अभियानात विद्यार्थ्यांची मदत घेतली आहे. संग्रामपूर तालुक्यातल्या वानखेड गावातल्या शिवशंकर विद्या मंदिर शाळेतले ३०० विद्यार्थी या अभियानात सहभागी झाले. त्यांना जलसंवर्धनाचं महत्त्व समजावलं. त्यासाठी जुलैच्या शेवटच्या आठवड्यात शाळेत नाट्य, वक्तृत्व,रांगोळी स्पर्धा झाल्या. स्वतःच्या कल्पनेतून विद्यार्थ्यांनी रांगोळ्या काढल्या. त्यातून जलसंवर्धनाचा संदेश दिला. मुलांनी प्रभात फेरी काढली. आसपासच्या गावांमध्ये घरोघरी जाऊन पावसाचं पाणी संचयित करण्याची माहिती मुलांनी दिली.
''बऱ्याचदा मजूर, कष्टकरी घरगाडग्याच्या रोजच्या चिंतेत असतात. त्यामुळे संध्याकाळ होताच विषयाचं गांभीर्य मागे पडलेलं असतं.'' डॉ निरुपमा सांगत होत्या. ''मात्र लहान वयात काही गोष्टी मनावर बिंबल्या तर त्या कायमस्वरूपी लक्षात राहतात. जलसंवर्धनाबाबतही जनजागृती विद्यार्थ्यांच्या माध्यमातून केली तर ती त्यांच्या घरापर्यंत पोहोचेल. ती अधिक प्रभावी, चिरंतन ठरेल, असं वाटलं.''
संग्रामपूरचे तहसीलदार महेश पवार, एसडीओ वैशाली देवकर, गट शिक्षण अधिकारी खरात, माध्यमिक शिक्षण अधिकारी श्रीराम पानझाडे या प्रयत्नात सहभागी झाले होते.
गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जामोद आणि संग्रामपूर या तालुक्यांची निवड जलशक्ती अभियानातंर्गत करण्यात आली आहे. जलपुनर्भरण , जलसंवर्धनाबाबत जागृती करण्यासाठी हे अभियान. जिल्हाधिकारी डॉ निरुपमा डांगे यांनी या अभियानात विद्यार्थ्यांची मदत घेतली आहे. संग्रामपूर तालुक्यातल्या वानखेड गावातल्या शिवशंकर विद्या मंदिर शाळेतले ३०० विद्यार्थी या अभियानात सहभागी झाले. त्यांना जलसंवर्धनाचं महत्त्व समजावलं. त्यासाठी जुलैच्या शेवटच्या आठवड्यात शाळेत नाट्य, वक्तृत्व,रांगोळी स्पर्धा झाल्या. स्वतःच्या कल्पनेतून विद्यार्थ्यांनी रांगोळ्या काढल्या. त्यातून जलसंवर्धनाचा संदेश दिला. मुलांनी प्रभात फेरी काढली. आसपासच्या गावांमध्ये घरोघरी जाऊन पावसाचं पाणी संचयित करण्याची माहिती मुलांनी दिली.
''बऱ्याचदा मजूर, कष्टकरी घरगाडग्याच्या रोजच्या चिंतेत असतात. त्यामुळे संध्याकाळ होताच विषयाचं गांभीर्य मागे पडलेलं असतं.'' डॉ निरुपमा सांगत होत्या. ''मात्र लहान वयात काही गोष्टी मनावर बिंबल्या तर त्या कायमस्वरूपी लक्षात राहतात. जलसंवर्धनाबाबतही जनजागृती विद्यार्थ्यांच्या माध्यमातून केली तर ती त्यांच्या घरापर्यंत पोहोचेल. ती अधिक प्रभावी, चिरंतन ठरेल, असं वाटलं.''
संग्रामपूरचे तहसीलदार महेश पवार, एसडीओ वैशाली देवकर, गट शिक्षण अधिकारी खरात, माध्यमिक शिक्षण अधिकारी श्रीराम पानझाडे या प्रयत्नात सहभागी झाले होते.
No comments:
Post a Comment