नाशिकमधली महानगरपालिकेची शाळा क्रमांक 18. तिथल्या शिक्षिका कुंदा बच्छाव. गेल्याच महिन्यात मनुष्यबळविकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. झिरो इन्व्हेस्टमेंट इनोव्हेशन फॉर एज्युकेशन इनिशिएटिव्ह या संस्थेच्या वतीनं.
कुठलीही आर्थिक गुंतवणूक न करता माध्यमिक गटातल्या विद्यार्थ्यांची गळती कुंदा मॅडमनी कमी करून दाखवली. " महानगरपालिकेतल्या मुलांनाही अभ्यासाची गोडी असते. " कुंदा मॅडम सांगतात. "सभोवताली घडणाऱ्या घटनांबद्दल त्यांनाही कुतूहल असतं. गरज असते योग्य मार्गदर्शनाची. वर्गात शिकवत असताना लक्षात येत होतं की, काही मोजकेच विद्यार्थी पटापट उत्तरं देतात आणि काही खूप मागे पडत होते. त्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण करता येत नव्हता. त्यावेळी 'दत्तक मैत्रीण' हा उपक्रम सुचला. "
दत्तक मैत्रीण उपक्रम दोन वर्षांपूर्वी सुरू झाला. एखाद्या मुलीचं गणित कच्च असेल तर तिला तिच्याच वर्गातली गणित उत्तम असलेली मुलगी दत्तक घेते. गणित उत्तम असलेली मुलगी दुसऱ्या मुलीकडून गणिताच्या संकल्पना पक्क्या करून घेते. वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करून गणित कसं सोडवता येईल ते शिकवते. वेगवेगळ्या विषयांच्या बाबतीत हा प्रयोग केला. बऱ्याचदा मुलं शिक्षकांना घाबरतात, त्यांना संकोच वाटतो. पण समवयस्क मैत्रिणीकडून शिकताना भीती, संकोच आपोआप गळून पडतात. जिथे अडते तिथे थेट संवाद होतो. वर्गात मिळणाऱ्या रिकाम्या वेळेचा यासाठी उपयोग केला जातो. यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला, अभ्यासाची गोडी लागली आणि शाळा मध्येच सोडून देण्याचं प्रमाणही कमी झालं.
या शाळेत आता स्पर्धा परीक्षांसाठीही आता मुलांची तयारी करून घेतली जात आहे. याखेरीज शुक्रवारी एखादा विषय सुचवला जातो. त्यावर विद्यार्थी शनिवारी कविता, नाटक सादर करतात. चित्रं काढतात. विविध संकल्पना सहजपणे त्यांना समजाव्यात, हा त्यामागचा हेतू असल्याचं कुंदा मॅडम सांगतात.
दत्तक मैत्रीण उपक्रम दोन वर्षांपूर्वी सुरू झाला. एखाद्या मुलीचं गणित कच्च असेल तर तिला तिच्याच वर्गातली गणित उत्तम असलेली मुलगी दत्तक घेते. गणित उत्तम असलेली मुलगी दुसऱ्या मुलीकडून गणिताच्या संकल्पना पक्क्या करून घेते. वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करून गणित कसं सोडवता येईल ते शिकवते. वेगवेगळ्या विषयांच्या बाबतीत हा प्रयोग केला. बऱ्याचदा मुलं शिक्षकांना घाबरतात, त्यांना संकोच वाटतो. पण समवयस्क मैत्रिणीकडून शिकताना भीती, संकोच आपोआप गळून पडतात. जिथे अडते तिथे थेट संवाद होतो. वर्गात मिळणाऱ्या रिकाम्या वेळेचा यासाठी उपयोग केला जातो. यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला, अभ्यासाची गोडी लागली आणि शाळा मध्येच सोडून देण्याचं प्रमाणही कमी झालं.
या शाळेत आता स्पर्धा परीक्षांसाठीही आता मुलांची तयारी करून घेतली जात आहे. याखेरीज शुक्रवारी एखादा विषय सुचवला जातो. त्यावर विद्यार्थी शनिवारी कविता, नाटक सादर करतात. चित्रं काढतात. विविध संकल्पना सहजपणे त्यांना समजाव्यात, हा त्यामागचा हेतू असल्याचं कुंदा मॅडम सांगतात.
-प्राची उन्मेष, नाशिक
No comments:
Post a Comment