
सदस्यांच्या घरात आपत्कालीन परिस्थिती उदभवली तर मदतपेटी तयार करण्यात आली आहे. रुक्मिणी भगत यांच्या बैलाचा मृत्यू झाला तेव्हा आणि वादळात लता चव्हाण यांच्या घराचं छप्पर उडून गेलं तेव्हा ही मदतपेटीच कामी आली. कोणाच्या घरात मंगलकार्य असल्यास ३० हजार रुपयांचं कर्ज. तर कोणाच्या मुलीचं लग्न झालं तर तिला दोन किंवा तीन हजाराचं अर्थसहाय्य.
या गटाला अलीकडेच पुण्यात गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते बायफ मित्र संस्थेच्या डॉ. मणिभाई देसाई गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. देशपातळीवर वैशिष्ठयपूर्ण काम करणाऱ्या संस्थेला हा पुरस्कार देण्यात येतो.
यावेळी केसरकर यांनी बचतगटाच्या कामाचं कौतुक केलं. प्रतिकूल परिस्थितीत स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठी बचतगट उपयुक्त ठरल्याची भावना माधुरी भगत यांनी यावेळी व्यक्त केली.
या गटाला अलीकडेच पुण्यात गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते बायफ मित्र संस्थेच्या डॉ. मणिभाई देसाई गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. देशपातळीवर वैशिष्ठयपूर्ण काम करणाऱ्या संस्थेला हा पुरस्कार देण्यात येतो.
यावेळी केसरकर यांनी बचतगटाच्या कामाचं कौतुक केलं. प्रतिकूल परिस्थितीत स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठी बचतगट उपयुक्त ठरल्याची भावना माधुरी भगत यांनी यावेळी व्यक्त केली.
प्राची उन्मेष, नाशिक
No comments:
Post a Comment