उसतोड मजूराच स्थलांतर नवं न्हाई राजंहो. पर जवा शेतकरी, जगाचा पोशिंदाच गाव सोडत असल तर आपली काय बिशाद!
ह्यो प्रसंग हाय नंदूरबार जिल्ह्यातला. मागल्या सालात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला हुता. म्हणून दुष्काळ पडला हायं. सारं कस ठप्प झालयं. सातपुड्याच्या महाकाय डोंगरात वसलेला नदंूरबार ह्यो जिल्हा. आदिवासी शेतकरी खरीप हंगामावर अवलंबून असत्याती. औंदा पाऊस न्हाही झाला अन्् शेतशिवारं ओस पडली. हाताला काम नसल्याने आदिवासी बांधव आपला कुटुंब कबिला घेऊन सौराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेशकडं गेला. ऊस तोडणी आणि बांधकाम, जिथ कुठबी काम मिळलं तिथ निघालेचं. विंचवाच्या बिऱ्हाडागत समदी गाव सोडताहेत. सरकार म्हणतयं मागेल त्याला काम देऊ, त्या टीवीवरबी जाहिरात येतीयं, रोजगार देऊ, हमी देऊ. पर कसचं काय? खर पाह्यल तर कशातच काय नाय. हजारोनं स्थलांतर होत हाय? पोराबाळांची पाटी फुटत हायं. इथले मजूर गेलते काम मागायला शासनाकडं. पर त्यास्नी कळाल काम अगुदरचं लईच जोरात सुरु हायती. परं कागदावर. मंग काय कोणचाबी सायेब पुसतं नसल्यान सोडल गाव.
मजूर तर मजूर, शेतकरीबी घर, शेती सोडून जातय लेकाहो. जिल्ह्यातील अनेक गावं-पाडे अशीच ओस पडल्याती. अनेक गावांमध्ये दिस-रात्र मसन शांती असत्ये. काही म्हातारी हाईत गावात, ती बी अखेरच्या घटका माेजीत. तुमीबी हे चित्र बघसाल ना रडसाल, मंडळीहो.
कवा सरकार ह्यांच्यासाठी काय करलं ते करलं.
पर याबी दुखा:त बळीराजा, मजूर आशा करतोय
‘दिस् येतील, दिस् जातील....
दुःख सरलं दुःख जातील...’
- रूपेश जाधव, नंदूरबार
No comments:
Post a Comment