Tuesday 21 May 2019

जोडलेली माणसं टिकवून कशी ठेवायची ते नवी उमेदमुळे कळलं

नोकरीच्या निमित्ताने अनेकांशी संपर्क येतो. दररोज नवीन लोक जोडले जातात. मात्र हीच जोडलेली माणसे टिकवून कशी ठेवावी हे मला शिकायला मिळाले नवी उमेदमुळे. नावाप्रमाणेच आम्हाला जगण्याची कला, सामाजिक भान शिकवणारी नवी उमेद. मेधाताई,लताताई आणि वर्षा मॕडम यांच्याकडून मिळणारे प्रोत्साहन नेहमी चालना देते. संवादातून सर्वच प्रश्न सुटतात. मात्र तो सुसंवाद असला पाहिजे हे लताताईंचे वाक्य. आपले संवादकौशल्य प्रभावी असले तर कोणत्याही क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटविता येतो. हा त्यानंतरचा अनुभव. कामानिमित्ताने राज्यभर फिरत असताना कधी मध्येच आमचा कॉल आला तर प्रेमळ उत्तर देणा-या लता ताई. सक्सेस स्टोरिज आणि त्यातून बदललेले संबंधितांचे आयुष्य, सर्वांनाच प्रेरणा देते. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भेटायला येणारे सदाबाबा आणि त्यांच्या वाणीतून समोर येणारे भयानक वास्तव अंगावर शहारे आणते खरे पण त्यावर मार्ग काढता येतो हेदेखील सुचविते.
जनसंवाद साधताना अंतर्गत सुसंवाद कसा ठेवावा?, एकीचे बळ काय असते ?याचे उत्तम उदाहरण म्हणजे नवी उमेदची टीम. वरिष्ठ, कनिष्ठ असा कोणताही भेद न करता सामंजस्याने काम करणारी आमची टीम जिथे 'इगो' ला कोणातच कोपऱ्यात स्थान नाही. प्रत्येक दिवशी मिळालेली अनुभवाची शिदोरी जगण्याचे बळ देते. प्रशांतदादांमुळे नवी उमेदशी जोडले गेले. नवी उमेदशी जोडल्याचा सार्थ अभिमान आहे. भविष्यातही याच जोमाने कार्य करून नवी उमेदच्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत. वर्धापन दिनाच्या याच कृतज्ञतापूर्वक शुभेच्छा.


-चेतना चौधरी, धुळे
#नवीउमेदतिसरावर्धापनदिन

No comments:

Post a Comment