Sunday 8 December 2019

नूतनच्या समुपदेशनामुळे थांबले बालविवाह

जालना जिल्हा. इथल्या नंदापूर गावतली सुनीता उबाळे. ती सातवीत असतानाचं तिच्या घरच्यांनी तिचं लग्न ठरवलं. तिला मात्र शिकायचं होतं, मोठ व्हायचं होतं. पण आई-वडिल व घरच्या मोठ्या लोकांसमोर तिचं काय चालणार होतं? ग्रामीण भागात मुलगी दहा-बारा वर्षाची झाली, म्हणजे मोठी झाली. मग आईवडिलां 
गावात गेल्यानंतर सुनीताचे आई-वडिल, सरपंच चव्हाण यांना भेटून या वयात लग्न न करण्याविषयी त्यांना संमजावलं. सरपंच, केंद्र प्रमुख हराळकर, शिक्षक, मुख्याध्यापक आणि गावकरी यांनी देखील याकामात पुढाकार घेतला. नूतन यांनी तिच्या सासरच्या मंडळींना बालविवाह का करू नये याबद्दल समुपदेशन केलं. अनेक प्रयत्नांनंतर सुनीताच्या आईवडिलांनी हा विवाह न करण्याचा निर्णय जाहीर केला. परंतु नवरा मुलगा सुनीता अठरा वर्षाची झाल्यावर मी हिच्याशीचं लग्न करणार असं म्हणून अडून बसला. तो मुलगा वयानं मोठा होता. कायद्यानुसार त्याचं लग्नाचं वय झालं होतं. नूतन यांनी त्याला दोघांच्या वयातील अंतर दाखवलं. तुझी आता लग्न करण्याची इच्छा असेल तर अठरा वर्ष पूर्ण झालेल्या दुसऱ्या मुलीशी लग्न करावं असा सल्लाही दिला. त्या मुलाला तो पटला, त्यानं अठरा वर्ष पूर्ण झालेल्या दुसर्‍या तरूणीशी विवाह केला. तर सुनीताच्या पुढील शिक्षणाची सोय कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात केली. गावातील सर्व लोकांसमोर प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या हस्ते सुनीताच्या आईवडिलांनी बालविवाह न करण्याच्या निर्णय घेतला म्हणून ग्रामसभेत त्यांचा जाहीर सत्कार केला गेला. याचे सकारात्मक परिणाम पुढे जिल्ह्यात झाले. बालविवाहाचं प्रमाण घटलं. सध्या सुनीता आहे पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. तसंच ती स्पर्धा परिक्षेची तयारी करत आहे.
ना तिचं ओझ वाटू लागतं. तिला परक्याचं धन समजल जातं, त्यामुळं जितक्या लवकर तिचं लग्न लावलं तितक्या लवकर, जबाबदारी संपली. अशातच एक दिवस जिल्हास्तरावर प्रश्‍नमंजूषेच्या स्पर्धेत नंदापूर शाळेला प्रथम पारितोषिक मिळालं, बक्षीस देण्यासाठी आलेल्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.राधाकृष्ण आले. त्यांनी शिक्षणात काहीही अडचण आली की, आपल्या टीमला मदत मागा असं आवाहन विद्यार्थ्याना केलं होतं. यावेळी जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत राबविण्यात येणार्‍या लिंगसमभाव व मुलींचे शिक्षण या कार्यक्रमाच्या जिल्हा समन्वयक असलेल्या नूतन मघाडे यांची तिच्याशी भेट झाली होती. काही दिवसानंतर घरी साखरपुड्यातच लग्न करायचं तिच्या कानावर आलं. शिकायचं आहे; लग्न करायचं नाही हे तिने शाळेच्या वर्गशिक्षकांना सांगितलं. दोन तीन दिवस ती सतत रडत होती, तिची परिस्थिती पाहून वर्गशिक्षकानी मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांचा फोन नंबर मिळवून सुनिताचं आणि त्यांचं बोलणं करून दिलं. त्यांनाही सुनीताने सांगितलं की मला लग्न करायचं नाही खूप शिकायचं आहे, तुमच्या सारखं मला पण सीईओ व्हायचं आहे, तुम्ही काही तरी करून माझ्या घरच्यांना समजावून सांगा. त्यानंतर त्यांनी ही घटना सर्व शिक्षा अभियानातील उपशिक्षणाधिकारी अशोक राऊत, सहायक कार्यक्रम अधिकारी सुनील मावकर व नूतन मघाडे यांना यावर कार्यवाही करायला सांगितली. बालविवाह थांबविण्यासाठी पूर्ण पाठींबा त्यांनी दर्शविला.
जालना जिल्ह्यात काम करत असताना प्रशासनाच्या माध्यमातून नूतन मघाडे यांनी अनेक बालविवाह समुपदेशनाने थांबविले आहेत. त्यासाठी तत्कालिन जिल्हा परिषदचे सीईओ बी.राधाकृष्ण, प्रेरणा देशभ्रतार, जिल्हाधिकारी श्याम देशपांडे, रंगा नायक, जालना पोलीस अधिक्षक ज्योती प्रिया सिंह, यांचं विशेष सहकार्य नूतन यांना लाभलं आहे. त्यांच्या मार्गदर्शनाने व प्रोत्साहनानेच अनेक बालिकांची बालविवाहच्या जाचक प्रथेपासून सुटका झाली, असं त्या आवर्जून सांगतात. 
नूतन यांच्या मते बालविवाहाचा प्रश्‍न हा मानसिकता बदल आणि लोकजागृतीतूनचं सुटू शकतो. कायदा मदतीला आहे. मराठवाड्याच्या अनेक भागात नेहमी दुष्काळ पडतो. या भागातील अनेक गावातील लोक ऊस तोड कामगार आहेत. त्यामुळं घरदार व गाव सोडून त्यांना स्थलांतर करावं लागतं. अशा वेळी वयात आलेली मुलगी सोबत घेऊन जाणं म्हणजे त्यांना संकट वाटतं व गावात कुठं आणि कुणाच्या जबाबदारीवर मुलीला सोडावं? हा प्रश्‍नच त्यांच्या समोर असतो. मग मुलगी वयात आली, की तिचं लग्न लावायचं आणि मुलीच्या जबादारीतून मुक्त व्हायचं हा लोकांचा मुलीकडे पाहायचा दृष्टीकोन, अशा वेळी मुलीच्या शिक्षणाची, त्यांच्या राहण्याची सोय करणं, बालविवाहामुळं मुलीचं होणारं मानसिक, शारिरीक शोषण याची जाणीव, आईवडिलांच उद्बोधन, बालविवाह रोखण्यासाठी कायदेशीर तरतूदींची माहिती लोकांना देणं, पथनाट्य, ग्रामसभा असे विविध जनजागृती करणारे कार्यक्रम त्यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषदच्या टीमने त्यावेळी राबवले. त्यात फोटोग्रॉफर, लग्न विधी लावणारे धर्मगुरू, पत्रिका छापणारे, मंडप डेकोरेटर, मंगल कार्यालय व केटरिंग करणार्‍यांच्या कार्यशाळा घेऊन त्यांना बालविवाहाचे दुष्परिणाम, ते रोखण्यासाठी उपाय, कायद्याची बाजू याची माहिती त्यांनी दिली. तसंच गावागावात अंगणवाडी ताई व ग्रामसेवक यांच्या टीम तयार करून त्यांना बालविवाह रोखण्याविषयी जनजागृती करण्याचं प्रशिक्षण दिलं. या कामासाठी पोलीस विभाग, युनिसेफचे संदीप शिंदे, महिला व बालकल्याण विभाग, बाल संरक्षण कार्यालय, उपमुख्यकार्यकारी अधिकरी वर्षा पवार, जिल्हा परिषदचा शिक्षण विभाग, विधी प्राधिकरण, चाईल्ड वेलफेअर कमिटी, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सभापती, सर्व शिक्षक संघटना, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक यांची विशेष मदत त्यांना लाभली. संपर्कासाठी फोन नंबर देण्यात आले. जिल्हा यंत्रणेचा व्हॉट्स अप ग्रुप तयार करून आलेल्या माहिती वरून तात्काळ उपाययोजना करण्यात येते. सर्व जिल्हास्तरावरील याचा परिणाम म्हणून लोकजागृती होऊन बालविवाह न करण्याची मानसिकता जिल्ह्यात तयार झाली.
बालविवाहाची जनजागृती करत असताना नूतन यांना सीमा(नाव बदलले आहे) नावाच्या एका हिम्मतीच्या बालिकेची गोष्ट आवर्जून आठवते. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील सीमा सहाव्या वर्गात शिकत असताना तिच्या वयापेक्षा 10-12 वर्षांनी मोठया व्यक्तीशी तिचा विवाह लावून देण्यात आला. आईचं लहानपणीचं निधन झाल्यानं, आजी आणि वडिलांनी सीमाला वाढवलं. ज्या व्यक्तीशी तिचा विवाह लावण्यात आला तो दारूच्या आहारी गेलेला होता. थोड्याच दिवसात सीमा नवर्‍याचं घर सोडून माहेरी आली. वडिलांनी तिला आधार देण्याऐवजी मुलगी माहेरी निघून आली, म्हणून दारूच्या नशेत आत्महत्या केली. वडिलांच्या मृत्यूनंतर आजीने लहान मुलं जन्मली की लोकांच्या घरी जाऊन गाणी गाऊन आणि निराधार योजनेतून जे काही पैसे मिळायचे त्यावर सीमाचा सांभाळ केला. याही परिस्थितीत सीमाने हार मानली नाही. तिनं शाळेत प्रवेश घेतला. 12 वी पर्यत शिक्षण पूर्ण केलं. तिला शिक्षणासाठी केंद्र शासनाच्या उच्च अधिकारी आकाशी मॅडम यांच्या मावशींनी आर्थिक मदत मिळवून दिली. तसंच जालना जिल्ह्यातील अजय किंगरे यांनी देखील तिला मदत केली. सीमाची परिस्थिती अतिशय विपरित असताना देखील न डगमगता शिक्षण घेतलं. तिचं हे सगळं धाडस अतिशय कौतुकास्पद आहे असं नूतन सांगतात.
बालविवाहाचं हे कार्य जोमाने करत असताना नूतन मघाडे यांना अनेक वेळा लोक विरोधही सहन करावा लागला. विरोध होत असूनही मुलींना माणूस म्हणून सन्मानाने समाजात जगता यावं यासाठी ही प्रबोधनाची चळवळ जालना जिल्ह्यात प्रशासनाच्या माध्यमातून सुरू ठेवली.
नूतन यांची आई शिक्षिका व वडील पोलिस विभागात असल्यामुळे आईकडून मिळालेला प्रामाणिकपणा, शिक्षकी वसा व वडिलांकडून मिळालेली हिंमत, अन्यायाविरुद्ध लढण्याचं बळ यामुळं त्यांनी निराश न होता आधिक उंच झेप घेतली. मूळ गांव टेंभुर्णी ता. जाफ्राबाद जिल्हा जालना येथील असलेल्या नूतन मघाडे यांनी 2000 मध्ये बावनेपांगरी येथे जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका म्हणून काम सुरू केलं. पुढे सर्व शिक्षा अभियानांर्तगत त्यांनी लिंगसमभाव व मुलींचे शिक्षण समन्वयक म्हणून यशस्वीपणे काम सांभाळलं. जालना जिल्ह्याला शिक्षण क्षेत्रात वेगळी ओळख देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने नवनवीन प्रयोग केले. बालहक्क, मीना राजू मंच, मासिक पाळी व्यवस्थापन, लोकजागृती, शाळा व्यवस्थापन समिती सक्षमीकरण, बेटी बचाओ बेटी पढाओ, युनिसेफचे विविध उपक्रम, शाळाबाह्य मुलांचे प्रश्न, जेंडर, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, समता विभागातील उपक्रम, पाठयपुस्तकामध्ये लिंग समभाव आणण्याससाठी प्रयत्न, गुणवत्ता विषयक उपक्रम राबविण्यात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.

मुलींची गुणवत्ता वाढविण्यासाठी, निवासी वसतीगृहाच्या सर्व सोयी सुविधा मुलींना वेळेवर मिळाव्या यासाठी जिल्हा व्यवस्थापन समिती समोर त्या विद्यालयाचे प्रश्न जिल्हा व्यवस्थापन व सल्लागार समिती समोर मांडून त्याचा सातत्याने पाठपुरावा करत होत्या. याकामात शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी व सर्व टीम त्यांना तितकीच मदत करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या कामाचा अनुभव व चांगल्या कामाची दखल घेऊन त्यांना सहाय्यक कार्यक्रम अधिकारी महाराष्ट्र् प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई मार्फत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे येथे राज्यस्तरावर काम करण्याची संधी देण्यात आली. महाराष्ट्र् राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) येथे समता विभागात शाळाबाह्य मुलांसाठी त्यांनी साडेतीन वर्ष काम केले आहे. या दरम्यान राज्यभरात बालरक्षक चळवळ उभी करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. बालविवाह हे मुलींचे शाळाबाह्य होण्याचे एक कारण आहे. परंतु बालरक्षकाच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या शाळाबाह्य मुलांच्या प्रश्नावर अभ्यास गेल्या साडेतीन वर्षांपासून त्या करत आहेत.
#नवीउमेद #नकोलगीनघाई
UNICEF India Swati Mohapatra Nutan Maghade Unmesh Gaurkar



- उन्मेष गौरकर, नांदेड

No comments:

Post a Comment