आम्हांला कुठेही रोजगारावर काम द्या नाही तर आम्ही आमचं कुटूंब चालवू शकत नाही अशी विनवणी करत शेतक-यांची कुटूंबं भटकताना पाहिली. औरंगाबादेतल्या काही कंपन्यांत या लोकांसाठी आम्ही काही जागा निर्माण केल्या आहेत. पण ती व्यवस्था पुरेशी नाही. तीनशे-साडेतीनशे रुपये रोजाने काम करण्यासाठी हे लोक औरंगाबाद एमआयडीसी भागात आश्रयाला आलेले दिसले. या लोकांमध्ये काही बागायतदार शेतकरी आहेत. उरलेले सर्व कोरडवाहू शेतकरी आहेत.
शेतीपध्दतीत बदल आवश्यक
मुळात पीक पध्दतीमध्ये आपण बदल करु शकलो किंवा शेतीवर अवलंबून असलेल्या तोंडांची संख्या कमी करु शकलो तर शेतीमध्ये ब-यापैकी उत्पन्न घेणं शक्य आहे. पण त्याच्यासाठी पाण्याचं नियोजन आवश्यक आहे. लोकांची स्मरणशक्ती फार वाईट आहे. पाण्याच्या अभावी जे हाल होतात, त्यांचा विसर त्यांना पाणी उपलब्ध असताना होतो. दुष्काळाच्या काळात थेंब थेंब पाणी वाचवतील, पण एकदा पाऊस पडला, विहिरीत किंवा त्यांच्याजवळच्या तलावात पाणी जमा झालं की जो काही पाण्याचा बेसुमार उपसा सुरू होतो, त्याला काही मर्यादा नाही. काही महिन्यांपूर्वीच आपण दुष्काळाचा सामना करत होतो ही गोष्ट ते विसरतात. तलावावरच्या विहिरीवरच्या मोटारी चोवीस तास सुरू असतात. आता कुठे लोकांना ठिबक सिंचनाचं महत्व थोडं थोडं पटू लागलं आहे. लोकांच्या या वागण्यामुळे पाण्याचा स्रोत आटतो. आपल्याला आलेल्या अनुभवातून लोकांनी शिकलं पाहिजे, आणि अनुभवांवर आधारित शेतीपध्दत विकसीत केली पाहिजे. असं झालं तर मराठवाड्यासारख्या भागात शेती हा व्यवसाय म्हणून फार उत्तम रित्या नाही, तर कुटुंब चालेल अशा पध्दतीने करता येईल.
- सिध्दार्थ पाटील
(शेतकरी, कन्नड इथे ग्रामीण भागातल्या मुलांसाठी सुरू असलेल्या कॉलेजचे संचालक, वरिष्ठ वयोगटात बॅडमिंटनचे राष्ट्रीय खेळाडू)
#नवीउमेद #दुष्काळ #मराठवाडा
मुळात पीक पध्दतीमध्ये आपण बदल करु शकलो किंवा शेतीवर अवलंबून असलेल्या तोंडांची संख्या कमी करु शकलो तर शेतीमध्ये ब-यापैकी उत्पन्न घेणं शक्य आहे. पण त्याच्यासाठी पाण्याचं नियोजन आवश्यक आहे. लोकांची स्मरणशक्ती फार वाईट आहे. पाण्याच्या अभावी जे हाल होतात, त्यांचा विसर त्यांना पाणी उपलब्ध असताना होतो. दुष्काळाच्या काळात थेंब थेंब पाणी वाचवतील, पण एकदा पाऊस पडला, विहिरीत किंवा त्यांच्याजवळच्या तलावात पाणी जमा झालं की जो काही पाण्याचा बेसुमार उपसा सुरू होतो, त्याला काही मर्यादा नाही. काही महिन्यांपूर्वीच आपण दुष्काळाचा सामना करत होतो ही गोष्ट ते विसरतात. तलावावरच्या विहिरीवरच्या मोटारी चोवीस तास सुरू असतात. आता कुठे लोकांना ठिबक सिंचनाचं महत्व थोडं थोडं पटू लागलं आहे. लोकांच्या या वागण्यामुळे पाण्याचा स्रोत आटतो. आपल्याला आलेल्या अनुभवातून लोकांनी शिकलं पाहिजे, आणि अनुभवांवर आधारित शेतीपध्दत विकसीत केली पाहिजे. असं झालं तर मराठवाड्यासारख्या भागात शेती हा व्यवसाय म्हणून फार उत्तम रित्या नाही, तर कुटुंब चालेल अशा पध्दतीने करता येईल.
- सिध्दार्थ पाटील
(शेतकरी, कन्नड इथे ग्रामीण भागातल्या मुलांसाठी सुरू असलेल्या कॉलेजचे संचालक, वरिष्ठ वयोगटात बॅडमिंटनचे राष्ट्रीय खेळाडू)
#नवीउमेद #दुष्काळ #मराठवाडा
No comments:
Post a Comment