धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर तालुक्यातले मिलिंद रघुनाथ पाटील. मिलिंद यांनी शेणापासून लाकूड तयार करतात. विशेष म्हणजे या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी पाच जणांना रोजगारदेखील उपलब्ध करून दिला आहे.
मिलिंद वाठोडा गावचे. तिथे २०१३ मध्ये त्यांनी दूध व्यवसाय सुरू केला. तेव्हा गाईंच्या शेणाचं काय करायचं, हा प्रश्न त्यांच्यापुढे होता. बाजारात शेणखताला अपेक्षित किंमत नाही. गुणवत्तापूर्ण खत कवडीमोल भावानं विकावं लागत असल्याचं दुःख त्यांना सतावत होतं. शेणाच्या इतर उपयोगाबाबत त्यांनी युट्युबवर शोध घेतला. त्यातूनच गवसला शेणापासून लाकूड तयार करण्याचा यशोमंत्र. त्यासाठीचं यंत्र शोधून, खरेदी करून गोठ्यात आणलं.
मिलिंद यांच्या गोठ्यातला शेणाचा प्रत्येक कण लाकडात परावर्तित केला जातो. दररोज ३०० दांड्या तयार होतात. तीन इंच बाय साडेतीन फूट लांबीच्या. दर १२ रुपये किलो.
हे लाकूड ते हॉटेल व्यावसायिक आणि आणि खानसामाना पुरवत आहेत. त्यांच्या लाकडाला आज ग्रामीण भागामध्ये अपेक्षित मागणी नाही. पण अंत्यविधीपासून अनेक कारणांसाठी असलेले या लाकडाचे उपयोग लोकांच्या हळूहळू लक्षात येत आहेत. कमी होणारी झाडांची संख्या आणि लाकडाची वाढती मागणी याचं समीकरण विसंगत आहे. हीच विसंगती मिलिंद यांच्या पथ्यावर पडणार आहे.
लाकडात गोमूत्राचा अंश असून ते पर्यावरणपूरक असल्याचं मिलिंद सांगतात. शेणापासून दररोज लाकूड तयार केले जात असल्यामुळे गोठा स्वच्छ राहतो. गोठ्यामध्ये रोगराई पसरण्याची शक्यताही कमी झाली आहे. . मिलिंद रोज अडीचशे ते साडेतीनशे लिटर दूध ते शिरपूर शहरात विकतात. एकूणच मिलिंद यांनी गोठ्यात 'आम के आम आणि गुठलियोन के दाम' या म्हणीला प्रत्यक्षात आणली आहे.
-कावेरी परदेशी, धुळे
No comments:
Post a Comment