मोबाईलच्या एका क्लिकवर सध्या हवी ती माहिती, बातम्या मिळवणं सोपं झालं
आहे. पण, ३५ वर्षांपूर्वी अशी स्थिती नक्कीच नव्हती. अशी विविध साधनं
नव्हती, समाज माध्यमं नव्हती. पण, त्या काळात होती ‘शेख अब्दुल समद नबी’
यांच्यासारखी माणसं.
बीड जिल्ह्यातील पाटोद्याचे शेख अब्दुल समद नबी. समद भाई ही त्यांची परिसरात ओळख. शालेय शिक्षण सुरू असताना समद भाई यांना नेहमी वाटायचं की आपल्या लिहिता, वाचता येण्याचा समाजाला फायदा व्हावा, लोकांच्या ज्ञानात, माहितीत भर पडावी. हा विचार त्यांनी कृतीत आणायचा ठरवला. आणि पाटोदा शहरात पंचायत समिती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक व इतर दोन ठिकाणी फलक लिहायला सुरुवात केली. हा युवक का आणि काय लिहितोय, याचं सुरुवातीला लोकांना आश्चर्य वाटायचं. परंतू, काळ गेला तसे समद भाई लिहित असलेले फलक लोकांसाठी माहितीचे स्त्रोत बनले. अनेकांना आपल्या गाव परिसरात काय घडामोडी घडताहेत हे या फलकावरुन कळायचं. शिवाय सुविचार, दिन विशेषही ते फलकावर नियमित द्यायचे. गोरगरीबांसाठी असलेल्या शासकीय योजनांची माहितीही ते या फलकावर देतात. हे फलक वाचण्याची लोकांना अशी सवय झाली होती की एखादा दिवस हुकला की समद भाई कुठे गेले, आज बोर्ड का लिहिला नाही, अशी विचारणा व्हायची.
गेली साडेतीन दशकं त्यांचं हे काम अखंडितपणे सुरू आहे. यासह सामाजिक सलोखा जपण्यासाठी ते नित्य प्रयत्नशील असतात. यातूनच त्यांना शासनाने सन २००६ मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र पुरस्कार देऊन गौरवलं. आज तंत्रज्ञानाच्या जमान्यातही त्यांनी आपले फलक लिखाणाचे काम सोडलेले नाही, हे विशेष.
- अनंत वैद्य, बीड.
बीड जिल्ह्यातील पाटोद्याचे शेख अब्दुल समद नबी. समद भाई ही त्यांची परिसरात ओळख. शालेय शिक्षण सुरू असताना समद भाई यांना नेहमी वाटायचं की आपल्या लिहिता, वाचता येण्याचा समाजाला फायदा व्हावा, लोकांच्या ज्ञानात, माहितीत भर पडावी. हा विचार त्यांनी कृतीत आणायचा ठरवला. आणि पाटोदा शहरात पंचायत समिती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक व इतर दोन ठिकाणी फलक लिहायला सुरुवात केली. हा युवक का आणि काय लिहितोय, याचं सुरुवातीला लोकांना आश्चर्य वाटायचं. परंतू, काळ गेला तसे समद भाई लिहित असलेले फलक लोकांसाठी माहितीचे स्त्रोत बनले. अनेकांना आपल्या गाव परिसरात काय घडामोडी घडताहेत हे या फलकावरुन कळायचं. शिवाय सुविचार, दिन विशेषही ते फलकावर नियमित द्यायचे. गोरगरीबांसाठी असलेल्या शासकीय योजनांची माहितीही ते या फलकावर देतात. हे फलक वाचण्याची लोकांना अशी सवय झाली होती की एखादा दिवस हुकला की समद भाई कुठे गेले, आज बोर्ड का लिहिला नाही, अशी विचारणा व्हायची.
गेली साडेतीन दशकं त्यांचं हे काम अखंडितपणे सुरू आहे. यासह सामाजिक सलोखा जपण्यासाठी ते नित्य प्रयत्नशील असतात. यातूनच त्यांना शासनाने सन २००६ मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र पुरस्कार देऊन गौरवलं. आज तंत्रज्ञानाच्या जमान्यातही त्यांनी आपले फलक लिखाणाचे काम सोडलेले नाही, हे विशेष.
- अनंत वैद्य, बीड.
No comments:
Post a Comment