बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव तालुक्यातील वाडी. ८५० घरांची वस्ती असलेलं
खेडेगाव. इथला प्रसाद ठाकरे. वय २७. राज्य लोकसेवा आयोगाची दिवाणी
न्यायाधीश (कनिष्ठ विभाग) आणि न्यायिक दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा
पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाला आहे.
प्रसाद सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला. प्राथमिक शिक्षण नगर परिषदेच्या मराठी प्राथमिक शाळेत. १० वीला ६० टक्के. १२ वीत ५१ टक्के. गुण कमी असल्यानं डॉक्टर होण्याचं स्वप्न बारगळलं. प्रसाद काहीसा हिरमुसलाच. घरची शेती करायची ठरवलं. जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात एकूणच पाऊस अनियमित. त्यामुळे शेतीतून उत्पन्न कमालीचं घसरलेलं. प्रसादनं तीन वर्ष शेती केली. त्यातच दीड लाखांचं कर्ज झालं.
त्याने एलएलबीला प्रवेश घेत वकिली करण्याचे ठरवलं. एलएलबीला ५७ टक्के तर एल एल एम ला 70 टक्के. शेतीतून घर आणि शिक्षण खर्च निघणं अशक्य होतं. प्रसादने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. दररोज किमान ७ ते ८ तास अभ्यास.
२५० गुणांच्या परीक्षेत प्रसादला लेखीमध्ये १०९ आणि मुलाखतीमध्ये ३२ गुण मिळाले.. या परीक्षेसाठी राज्यभरातून जवळपास १५ हजार विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते. मात्र, अंतिम यादीत फक्त १९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ''परिस्थितीचा बाऊ करण्यात अर्थ नसतो. संघर्ष करावाच लागतो. जिद्द मात्र सोडायची नाही. कुठे ना कुठे यश मिळतंच.'' असं तो आत्मविश्वासानं सांगतो. वडील साहेबराव यांची प्रेरणा आणि अखंड साथ यामुळे जिद्द कायम राहिली, असं प्रसाद सांगतो.
-दिनेश मुडे, बुलडाणा
प्रसाद सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला. प्राथमिक शिक्षण नगर परिषदेच्या मराठी प्राथमिक शाळेत. १० वीला ६० टक्के. १२ वीत ५१ टक्के. गुण कमी असल्यानं डॉक्टर होण्याचं स्वप्न बारगळलं. प्रसाद काहीसा हिरमुसलाच. घरची शेती करायची ठरवलं. जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात एकूणच पाऊस अनियमित. त्यामुळे शेतीतून उत्पन्न कमालीचं घसरलेलं. प्रसादनं तीन वर्ष शेती केली. त्यातच दीड लाखांचं कर्ज झालं.
त्याने एलएलबीला प्रवेश घेत वकिली करण्याचे ठरवलं. एलएलबीला ५७ टक्के तर एल एल एम ला 70 टक्के. शेतीतून घर आणि शिक्षण खर्च निघणं अशक्य होतं. प्रसादने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. दररोज किमान ७ ते ८ तास अभ्यास.
२५० गुणांच्या परीक्षेत प्रसादला लेखीमध्ये १०९ आणि मुलाखतीमध्ये ३२ गुण मिळाले.. या परीक्षेसाठी राज्यभरातून जवळपास १५ हजार विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते. मात्र, अंतिम यादीत फक्त १९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ''परिस्थितीचा बाऊ करण्यात अर्थ नसतो. संघर्ष करावाच लागतो. जिद्द मात्र सोडायची नाही. कुठे ना कुठे यश मिळतंच.'' असं तो आत्मविश्वासानं सांगतो. वडील साहेबराव यांची प्रेरणा आणि अखंड साथ यामुळे जिद्द कायम राहिली, असं प्रसाद सांगतो.
-दिनेश मुडे, बुलडाणा
No comments:
Post a Comment