Tuesday 7 January 2020

भूक भागवायला हवी (बातम्या : तुमच्या आमच्या मुलांच्या)

मैत्रीण जया हिचा फोन. 'दरवर्षीप्रमाणे आदिवासी पाड्यांमध्ये लहान मुलांकरिता फराळवाटप कार्यक्रम करण्यामध्ये खूप बिझी आहे, दिवाळीभेटीचा कार्यक्रम पुढे ढकलुया.' तिच्या कामाचा आदर करून आम्ही मैत्रिणी राजी झालो. तिचा दरवर्षीचा हा कार्यक्रम, ती नित्यनियमाने बरीच वर्ष करते. खरंच काम तसं स्तुती करण्याजोगं, पण आपलं काम फक्त एकदिवसांपुरतं नसावं असं देखील वाटत. जया करते ते काम नक्कीच छानच आहे. एका व्यक्तिगत पातळीवर प्रत्येकाने आपली नैतिक जबाबदारी पाळायलाच हवी. यात दुमत नाहीच. पण नुकत्याच देशभर असणाऱ्या कुपोषित मुलांची आकडेवारी समोर आलेय आणि ती खूपचं चिंताजनक आहे.
सर्व्हेतून असं समोर आलंय की कुपोषणामुळे २० पैकी ५ मुलं त्यांचा पाचवा वाढदिवस होण्यापूर्वीच मृत्यू पावतात. वाचून भयानक वाटतं. भारत देश अन्न उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर आहे. पिकवलेलं धान्य साठवायला गोदामं अपुरी पडत आहेत. अशा आपल्या देशात हे वास्तव? नेते जगभरात भारत विकासाचा उच्चांक गाठत आहे म्हणून आरोळी ठोकत आहेत. आणि आपली भावी पिढी अन्न अन्न म्हणून तडफडत आहे. सामान्य नागरिक म्हणून देखील आपण याचा विचार करायला हवा.
अनेक सरकारी योजना असूनही कुपोषणासारखी समस्या भेडसावते. सर्व्हेतून असंही समोर आलंय की, दलित आणि आदिवासी मुलं कुपोषणाचे जास्त बळी पडत आहेत. आदिवासी भाऊ-बहिणींकरीता तर अनेक यॊजना आहेत. पण त्या कितपत त्यांच्यापर्यंत पोचतात? योजना राबवण्यात आपण कुठे न कुठे कमी पडत आहोत. साधनसामुग्री पुरेशी उपलब्ध आहे. फक्त या समस्येला प्राथमिकता देणं गरजेचं.
- लता परब
बातमीची लिंक : https://scroll.in/…/hunger-is-indias-greatest-problem-even-…

No comments:

Post a Comment